Pages

Saturday, 12 April 2014

अजून किती विटंबना?

लडकोंसे गलती हो जाती हैम्हणत परवाच सपाच्या मुलायमसिह यादवांनी आपल्या निर्दयी काळजाचं दर्शन घडवलंशक्ती मिल बलात्कार प्रकरणात तीन युवकांना झालेली फाशीची शिक्षा त्यांना भलतीच झोंबली असावीएखाद्या प्रकरणात इतक्या झटपट निकाल लागलाआणि त्यातही इतक्या कठोर शिक्षा होऊ लागल्या तर यांच्या बगलबच्च्यांचं काय होणारया चिंतेने त्यांना ग्रासलंयम्हणूनच सत्तेवर आल्यास बलात्कार करणाऱ्यांना  फाशी देणारा कायदाच रद्द करण्याची घोषणाही त्यांनी केली.

मुलांकडून तारूण्याच्या भरात होतात चुकामान्यपण त्याच्या चुकांची शिक्षा मुलींनी का आयुष्यभर भोगायचीआणि तेही तीच चुका (गुन्हा नव्हे?) करणारी मुलं उजळ माथ्याने आजुबाजूला फिरत असतानाया विचार मुलायमसिंहांच्या मनात आला नाही काका एवढा विचार करण्याची त्यांची कुवतच नाहीनिवडणुकीच्या रणधुमाळीत लक्ष वेधून घेण्याची या असल्या राजकरण्यांना कायम गरज भासतेपण त्यासाठी इतक्या हीन पातळीवर जाण्याची काय गरज?

आणि त्यातही योगायोग म्हणा किंवा हेतुपुरस्सरमुलायमसिंहांनी संदर्भ दिलाय तो शक्ती मिल बलात्कार प्रकरणाचाखरंतरं बलात्काऱ्यांना फाशीच व्हावीही मागणी जोर धरू लागली ती निर्भया प्रकरणानंतरत्यावेळच्या जनरेट्यामुळे सरकारला अशा गुन्ह्यांसाठी कठोर कारवाईची तरतूद करावी लागलीया प्रकरणातही चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेलीपण तेव्हा मुलायमसिंह काहीच बोलले नाहीतेव्हा त्यांना त्या चार जणांचा कैवार घ्यावा असे वाटले नाहीपण शक्ती मिल प्रकरणात तिघांना फाशी सुनावल्यावर मात्र त्यांना गहिवर दाटून आलाशक्ती मिल प्रकरणातील आरोपींची नावं आणि निवडणुकीची हवा याची सांगड घातली तर या करूणेमागचं कारण सहज स्पष्ट होईल.

अर्थात कालपर्यंत ही केवळ शंकाच होतीपण मुलायमसिंह यादवांचे महाराष्ट्रातील चेले अबू आझमी यांनी काल जे अकलेचे तारे तोडले त्यावरून हा संशय अधिकच बळावलाविवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेबरोबरच बलात्कार झालेल्या महिलेलाही फाशीची शिक्षा द्यायला हवीअशी मुक्ताफळं त्यांनी उधळलीवाह रे वाम्हणजे मुलं चुकतात म्हणून त्यांना सोडून द्यायचंआणि त्यांच्या चुकांची तक्रार केली म्हणून मुलींना फासावर चढवायचंहा यांचा न्यायआणि त्याला आधार म्हणून इस्लामचा कायदाइस्लाम मध्ये सांगितलंय म्हणे ! काय बदनामी चालवली आहे स्वत:च्याच धर्माची!

आज ज्यांच्यावर बलात्कार होत आहेतत्या मुली सात महिन्यांपासून सत्तर वर्षांच्या आहेतत्यातल्या निर्भया आणि गुडिया सारख्या कित्येक निष्पाप मुली सामुहिक बलात्काराचा भार सहन न झाल्याने जीव गमावून बसल्या आहेतत्यांना तुम्ही फाशी देणार?

कुठेही बलात्कारांच्या घटनांविरोधात आवाज उठायला लागला कीमुलींचे कपडेच आक्षेपार्ह होतेमुली कशाला रात्री-अपरात्री हिंडतातमुलीच बलात्काऱ्यांना उद्युक्त करतातअसली काहीतरी बेपर्वा विधानं करून चर्चेचा ओघ आपल्याकडे वळवायचा आणि मुळ मुद्याला फाटा फोडायचा असलं करंटे उद्योग आपल्याकडे नेहमीच चालतातपण सात – आठ महिन्यांच्या बालिकांनी असं काय आक्षेपार्ह केलं होतंयाचं उत्तर देणं मात्र सोयीस्कर टाळतातनिर्भया प्रकरणात तर एका स्वयंघोषित संतानं कळसच केला होतातीनं त्या मुलांना भैया म्हणून विनवणी करायला हवी होतीत्यांनी तिला सोडून दिलं असतंतिने त्यांना प्रतिकार करायचा प्रयत्न केला ही तिचीच चुकअसं जाहीर करून टाकलं. (अर्थात हाच थोर संत नंतर स्वत:च बलात्काराच्या आरोपावरून तुरूंगात गेला हा भाग वेगळा.) तर अजून एका थोर बापूंनी बलात्काऱ्यांपासून रक्षणासाठी स्वत:च्या नावाची चालिसाच जपायला सांगितली.

बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याविषयी इतकी टोकाची असंवेदनशील व्यक्तव्ये करूनही यापैकी कुणाचंच समाज काहीच बिघडवू शकला नाहीहे विशेषचार दिवस बातम्या आल्या आणि गेल्यामहिलांची सुरक्षा तशीच टांगणीली लागलेलीअब्रुचे धिंडवडे रोजचेचएकूणच महिला कितीही शिकल्या-सवरल्या तरी त्यांना स्वत:चा ठाम आवाज नाहीहे सगळ्यांनीच जाणलंआणि म्हणूनच निवडणुकीत मतांची बेगमी करण्यासाठीएका गटाला खुश करण्यासाठी देशातल्या ५० टक्के मतदार असलेल्या महिलांच्या जखमेवरील खपली काढली गेली.

आरोपींचा कड घेतानाआपण पिडीतांचा अपमान करतो आहोत याची चाड बागळण्याची गरज उरली नाहीआरोपीला केवळ आरोपी म्हणूनच बघायला हवंत्याचा जातप्रांतधर्म बघू नयेपण दुर्दैवाने आपल्याकडे तसे होत नाहीनिवडणुकाजवळ आल्या की विशिष्ट गटाला खुश करण्यासाठी वाट्टेल त्या तडजोडी केल्या जातातआणि त्याचं कुणालाचं काही वाटत नाही.

साड्या वाटल्या नि हळदीकुंकुचा घाट घातला की बायका खुशयापलीकडे काही विचार करायची गरज उरली नाहीमहिलांच्या नावावर अनेक योजना आल्या आणि गेल्याअनेकांनी संघटना काढल्या - चालवल्याआंदोलने किली आणि संपवलीपण अजुनही महिलांना समान हक्क तर सोडाचसन्मानानं जगण्याचा  हक्कही मिळाला नाहीतिची विटंबना कायमच राहिली.