स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कट्टर अनुयायी, सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे संस्थापक, हिंदूमहासभेचे ज्येष्ठ नेते, ‘प्रज्वलंत’चे संपादक विक्रमराव सावरकर यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. एक प्रखर हिंदुत्त्ववादी झंझावात शांत झाला. या अनपेक्षित बातमीने धक्काच बसला. पण त्याहूनही अधिक धक्का बसला तो ही बातमी देणार्या मिडियाच्या उदासीनतेचा. सगळ्याच प्रमुख वृत्तपत्रांनी केवळ दहा ओळींची बातमी देऊन आपली जबाबदारी संपवली. 'सावरकरांचे पुतणे विक्रमराव सावरकर यांचे निधन.' एवढाच आशय? इतर वेळी जरा काही खट्टू झाले की चार पानी पुरवणी आणि पानभर फोटोंचे दळण दळणारी वृत्तपत्रे अचानक कशी गप्पगार झाली? काहीही घडले न घडले तरी दंडुके घेऊन फिरणारी इलेक्ट्रॉनिक मिडियावाली मंडळी कुठे गायब झाली? विक्रमरावांचे कार्य, त्यांचे समाजाप्रती योगदान, त्याचे विचार अशा कितीतरी सांगण्यासारख्या गोष्टी असताना सगळ्यांनीच सोयीस्कर मौन का पाळले?सावरकरांचे पुतणे एवढंच काही विक्रमरावांचं कर्तृत्त्व मर्यादित नव्हतं. हिंदू संघटनांच्या कार्यळे हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी देशभर हिंडून अखंड हिंदुस्थान, समान नागरी कायदा, हिंदूंचे हितरक्षण आदींसाठी काम केले. मुंबई महानगर पालिकेत ‘वंदे मातरम्’ हे देशभक्ती गीत म्हणावे यासाठी मोर्चा काढला. तसेच विधानसभेत चर्चा घडवून आणली. भिवंडी येथे शिवजयंती मिरवणूक निघाली, मलंग गडावर हिंदूंसाठी असलेली पूजा करण्याची बंदी दूर व्हावी यासाठीही त्यांनी आंदोलन केले. स्वातंत्र्ङ्मवीर सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून विक्रम सावरकर यांनी मुरबाड, जिल्हा-ठाणे येथे ‘महाराष्ट्र सैनिकी विद्यालय’ सुरू केले होते. आजारपणामुळे सार्वजनिक आणि सामाजिक जीवनातून निवृत्ती घेतल्यानंतर ते या शाळेचा आकारात गेल्या काही वर्षांपासून रहात होते. मुरबाडमधील याच शाळेत त्यांनी शेवटचा श्वास घेतला. विक्रमराव सावरकरांचे निधन कधी कुठे कसे झाले, हे जरी आजच्या प्रसारमाध्यमांनी जनतेपर्यंत पोहोचवले असते तरी त्यांच्या या एका कार्याचा परिचय जनतेला झाला असता. पण दुर्दैवाने अनेकांनी तेवढीसुद्धा तसदी घेतली नाही.
अनुल्लेखात अनादर :
‘सावरकर यांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी दादर येथील निवासस्थानी गर्दी केली होती.’ बहुतेक वृत्तपत्रांनी याच एका स्टिरीओटाईप वाक्याने बातमी अक्षरश: संपवली. या एका वाक्यात त्यांनी महाप्रचंड हिंदू जनसमुदायाच्या नेत्याला एका छोट्या संघटनेशी बांधून टाकलं. त्याचं कर्तृत्व दडपलं.
मोदी समान नागरी कायदा आणण्याची घोषणा करतात, म्हणून ते हिरो. पण उभं आयुष्य याच कायद्यासाठी जनजागृती करणार्यासाठी वेचणार्या विक्रमरावांची दखलही घ्यायची नाही, हा दुटप्पीपणा कशासाठी?
सावरकर हिंदूत्त्ववादी होते. मात्र त्याहूनही अधिक ते वास्तवदर्शी होते. भविष्यात हिंदू अल्पसंख्य होतील, म्हणून प्रत्येक हिंदू दाम्पत्याने पाच मुले जन्माला घालावीत. असल्या हास्यास्पद कल्पना त्यांनी मांडल्या नाहीत. सन 1998च्या प्रज्वलंत दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ पाहा. ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब, राष्ट्रीय कुटुंब’ हाच त्यांचा नारा आहे.
राष्ट्रवादाच्या आड येणारा हिंदुत्त्ववाद त्यांनी कधीच मांडला नाही. तरीही तथाकथित धर्मनिरपेक्षवाद्यांनी त्यांनी आयुष्यभर अहवेलनाच केली.
प्रसिद्धीपराड़मुख :
अर्थात कुणी मान सन्मान द्यावा, अशी सावरकरांची अपेक्षाच नव्हती. प्रसिद्धीची हौस नव्हती. त्यांच्यातील गुणसंपदा जाणणार्यांना आणि त्यांच्या काही मित्रांना वाटे, ठयांनी जरा तडजोड केली असती तर ते कुठल्याकुठे पोचले असते! म्हणजे उच्चपदी विराजमान झाले असते, प्रकाशझोतात राहिले असते. संपन्न आयुष्य जगले असते. रोज हारतुरे गळ्यात पडले असते. उपेक्षेचं विष असं जन्मभर प्यावं लागलं नसतं.ठ पण विक्रमरावांनी कधीच असल्या सगळ्या गोष्टींच्या मागे गेले नाहीत. हारतुरे, सन्मान, स्वार्थ यांचा विचार मनात होताच कुठे? देशहिताच्या कृतीचाच आग्रह होता. जे जे देशहितविरोधी, त्याला त्याला विरोध करण्याचीच शपथ होती. ‘वरं जनहितं ध्येयम्’ हाच बाणा होता आणि त्या कर्तव्यपूर्तीचं समाधान हेच त्यांच्या लेखी सर्वश्रेष्ठ आणि सर्वतोपरी होतं.
नवी पिढी अनभिज्ञ :
मात्र त्यांच्या या प्रसिद्धीपराड़मुख वृत्तीमुळेच बहुदा नवी पिढी त्यांच्या कार्यापासून अनभिज्ञ राहिलेली दिसते. कारण एरवी कुठलीही बातमी पारंपरिक मिडियाने दाबली तरी सोशल
मिडियावर पसरतेच. विक्रमरावांच्या बाबतीत तेही घडलं नाही. खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच आज समाजात असंख्य गैरसमज आहेत. असे असताना विक्रमरावांना न्याय मिळणं कठीणंच. सावरकरवादी म्हणजे कुणी तरी अतिजहाल, प्रतिगामी असा एक सुप्त मतप्रवाह आज समाजात आहे. गांधी हत्येनंतरही गांधीचं उदात्तीकरण झालं. पण सावरकरांचे विचारसुद्धा लोकांपर्यंत जसेच्या तसे पोहचू शकले नाहीत. त्यामुळे ज्यांना सावरकरांबद्दल आदर आहे, त्यांना सुद्धा ‘सागरा प्राण तळमळला...’च्या पलीकडे काही सांगता येत नाही अशी आजची स्थिती आहे. किंबहुना खरे सावरकर जनसामान्यांपर्यंत पोहचू नयेत, अशीच आजची योजना आहे. एरवी स्थानिक पुढारी किंवा भ्रष्टाचारी राजकारण्यांच्या जयंती/ मयंती निमित्त सगळीच वृत्तपत्रे चार-आठ पानी पुरवणी काढतात. पण विामरावांच्या कार्याची पानभर सुद्धा दखल घेतली गेली नाही.
पत्रकारांचं मौन :
ब्रिटिश गेल्यानंतरही काँग्रेस शासनाने अनेक धोरणांत त्यांचीच भ्रष्ट नक्कल चालू ठेवली. परिणामी हिंदुहितासाठी धडपडणं प्राप्त झालं. मुंबईहून निघणार्या साप्ताहिक हिंदू (मराठी) ने 1950 ते 1968 याकाळात ही कामगिरी केली. पण दुर्दैवाने स्वा. सावरकरांच्या आत्मार्पणानंतर दोनच वर्षात हे पत्र बंद पडलं. अशा परिस्थितीत विक्रमरावंानी प्रज्वलंत सुरू केलं. 2005 पर्यंत प्रज्वलंत सातत्याने प्रकाशित होत राहिला. त्याचं संपादन स्वत: विक्रमराव करीत असत.
मिताक्षरी, परंतु घणाघाती अग्रलेख हे प्रज्वलंतचं वैशिष्ट्य. त्यांचं भाषाविषयक ज्ञान आणि शब्दांचं अचूक भानही वाखाणण्यासारखं होतं. इतर अनेक व्यापांतून वेळ काढूनही विक्रमरावांनी प्रज्वलंतचा डोलारा व्यवस्थित सांभाळला. या अर्थाने विक्रमराव संपादक - पत्रकारही होते. पण तरीदेखील कुठल्याही विामरावांच्या निधनाची दखल घेतली नाही, याचे वाईट वाटले.
वर्तमानपत्रात बातमी छापताना मालकाची पॉलिसी जपावी लागते, हे मान्य. परंतु स्वत:च्या संघटनेत तरी त्यांना मान द्यायला हरकत नव्हती. एरवी कुणीही लहान-मोठा लेखक-पत्रकार गेला तरी थोर विचारवंत गेल्याच्या अविर्भावात शोकसभेत भाषण वाचणार्यांना विक्रङ्कराव सावरकरांविषयी बोलायला जड का जावं?
भरवशाच्या म्हशीला टोणगा :
सावरकर आणि हिंदुत्त्व हे अगदी एकमेकांना जोडलेले विषय. आज शिवसेना आणि भाजप राज्यात आणि देशात हिंदू कार्ड वापरून सत्ता काबीज करू पाहताहेत. पण दुर्दैवाने या पक्षांनी सुद्धा विक्रमरावांची फारशी दखल घेतली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ‘भाजप’चे नेते नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आदींनी सावरकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. अशी एक ओळ सोमवारच्या सगळ्या वृत्तपत्रांत झापून आली खरी, पण तेवढ्यानं काही होतं नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे खरे हिंदुहृदयसम्राट. ‘गर्व से कहो हम हिंदू है!’ हा हिंदू महासभेचा नारा. बाबरी ढाचा पाडल्ङ्मावरून दंगल झाल्यानंतर हे शिवसेनाप्रमुख स्वङ्मंघोषित हिंदुहृदयसम्राट झाले आणि हिंदूत्त्व ही शिवसेनेची भूमिका झाली. या अर्थाने शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकरांशी आणि हिंदू महासभेच्या विक्रमराव सावरकरांशीही जोडली जायला हवी होती. पण तसे काही झाले नाही. काही मोजके अपवाद वगळता हा हिरा फारसा प्रकाशात आलाच नाही.
विचारांचा यज्ञ पेटवा :
किमान आता तरी या परिस्थितीत बदल व्हायला हवा. विक्रमरावांना व्यक्ती म्हणून मोठेपणाचा हव्यास नव्हता. पण आज देश तारायचा असेल तर सावरकरांच्या विचारांची गरज आहे, ही त्यांची भूमिका निश्चितच योग्य होती. आज बहुतांश प्रसारमाध्यमे कुणा ना कुणाच्या दावणीला बांधली गेली आहेत. त्यात अनेक तथाकथित सेक्युलरवादी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सावरकर जनतेपर्यंत पोहोचविण्याची अपेक्षाच करता येणार नाही. त्यामुळे जे अजून कुठल्या दावणीला बांधले गेले नाहीत किंवा जे स्वत:ला हिंदूत्त्ववादीच म्हणवतात, त्यांच्याकडून आज देशाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. देश देशातल्या नट-नटांच्या बातम्या देता, त्याचबरोबर देश उभारणारे विचारसुद्धा दिले पाहिजेत. एवढीच माफक अपेक्षा.
