सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी बिगुल वाजले, सैन्य तैनात झाले आणि रणांगणावर शूरवीर, योद्धे यांची जमवाजमव सुरू झाली तेव्हा अनेकांना कळले की आपल्या पायाखालची वाळू निसटते आहे. ती वाळू आहे की माती? पाय सटकताहेत की ओढले जाताहेत? बरं, ते नेमके कोण ओढताहेत? परकीय की स्वकीय? शत्रूपक्षातील कार्यकर्ते आहेत का हे पाय ओढणारे की आपल्याच गोटातले आपलेच पाय आजवर चाटणारे आपलेच लोक आहेत? या संभ्रमात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते विरोधकांवर कशा प्रकारे कुरघोडी काढता येईल, याचा विचार करत आहेत.
महाराष्ट्र प्रांतात तुर्तास तरी रणांगणावर उधाण आले आहे महाराजा, आणि यात कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार. कोणी बघता बघता गल्लीतून दिल्लीत जाणार तर कोणी दिल्लीचे स्वप्न पाहता पाहता तुरुंगात खितपत पडणार. काळ सर्वात मोठा विश्लेषक असतो. त्याच्याकडे सर्व रोगांवर, आजारांवर उपाय आहे. तो वेळच्या वेळी सारं घडवतो, तोच पसारा मांडतो आणि तोच सारं मोडून तोडून मोकळा होतो. त्याच्या तडाख्यात सापडलेले मग राजकीय आणि सामाजिक पटलावरूनही नाहिसे होतात. महाराष्ट्रात सध्या अशी प्रकरणे वाढीस लागली आहेत. निमित्त आहे ते निवडणुकांचे. पण सुमारे 70 हजार कोटी रुपयांच्या सट्टाबाजारात दिल्लीत कोणाचे सरकार आणि महाराष्ट्रातून कोणाचे किती उमेदवार, यावर हा खेळ भरकटतो आहे.
या वावटळीत 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण अशा वल्गना करणार्या शिवसेनेचे पानिपत होत आहे. शिवसेना सोडून खासदार, आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते दूर जात आहेत. आजवर ते आपल्याकडे होते तेव्हा त्यांचे गुण-अवगुण दिसले नाहीत. पण ते सोडून जाताच ते गद्दार होते, असा साक्षात्कार शिवसेनेतील धेंडांना लागला आहे. मुळात शिवसेना आता बाळासाहेबांच्या निधनानंतर ‘पोरकी’ व सर्वसामान्य शिवसैनिकांना ‘परकी’च झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व नेभळट आणि बालिश असल्याची टीका हा पक्ष सोडून परपक्षात प्रवेश घेणार्या माजी शिवसैनिकांनी केली आहेच. यंदाची लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी महायुती सज्ज असल्याचा दावा केला जातो आहे, ती महायुती आतून किती पोखरली आहे, ते न दिसण्याएवढे मतदार दुधखुळे नाहीत. महागाई, भ्रष्टाचार, सुरक्षितता वगैरे तेच तेच पठडीतले मुद्दे घेऊन केंद्रात बदल घडवण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती प्रयत्न करणार, असे चित्र उभे केले जात आहे.
पण मध्यंतरी शिर्डीतून खासदार भाऊसाहेब वाघचौरे शिवसेना सोडून गेले, शिर्डीतून उमेदवारी मिळालेले बबनराव घोलप यांना तर 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. साईबाबांची शिर्डी शिवसेनेला यंदा तरी धार्जिणी नाही. पण मुख्य मुद्दा असा आहे की, भष्टाचारी बबनराव घोलप यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगवास होतो, तोही त्यांनी 1999 मध्ये महाराष्ट्रातील युती सरकारच्या काळात केलेला असतो, त्यावेळी ते समाजकल्याण मंत्री असतात, गेली 14 वर्षे त्या भ्रष्टाचार प्रकरणाचा ससेमिरा त्यांच्या मागे असतो, अशा वेळी, अशा काळात शिवसेनेचे दिग्गज नेते, जे भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठवण्याच्या पोकळ गर्जना शिवतीर्थावर आणि दादरच्या शिवसेना भवनातून देतात, त्यांना यंदा जनतेसमोर तोच मुद्दा घेऊन येण्यास कुठले तोंड उरले आहे? अण्णा हजारे यांनी वारंवार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा यांच्या नेत्यांची पाळेमुळे खोदून त्यांच्या भ्रष्टाचारी प्रकरणाची अगदी पुराव्यांसकट तक्रार केली होती. त्यात त्यांची कितीतरी वर्षे खर्ची पडली. त्यापैकी काही नेत्यांवर कारवाई झाली, काही जण मोकळे सुटले, काहीजणांना पक्षाने पदराआड घेऊन बचाव केला. काही ठिकाणी अण्णाच उघड पडले तर काही ठिकाणी भ्रष्टाचारी नेत्यांपेक्षा पक्षाची नाचक्की झाली. असे हे खेळ बरेच रंगले या काळात.
पण जेव्हा बबनराव घोलपांचा घोळ समोर आला तेव्हा मात्र शिवसेना नेते संभावितासारखे वागू लागले. त्यांनी आपल्या मतदारांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात शिवसेना आपले उमेदवार उभे करून लोकसभेसाठी इतर राज्यातही आपण सज्ज असल्याचा देखावा उभा करण्यात मशगुल झाले होते. मघाशी म्हटले त्याप्रमाणे शिवसेनेच्या पायाखालची वाळू निसटत चालली आहे. अशावेळी जुनी जाणती अनुभवी माणसं त्यांना नकोशी झाली आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. भाऊसाहेब वाघचौरे, उदय दुधगावकर, आनंद परांजपे, गजानन बाबर, राहुल नार्वेकर, मोहन रावले, अभिजीत पानसे, रवींद्र माने, त्याआधी भास्कर जाधव, राज ठाकरे, नारायण राणे, सतीश प्रधान, गणेश नाईक, छगन भुजबळ असा इतिहास आहे, या मंडळींनी शिवसेना सोडली व इतर पक्षांची कास धरली. प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे यांच्यासह मिलिंद नार्वेकर यांचेही नाव पुढे यायचे. याच मिलिंद नार्वेकरमुळे आम्हाला शिवसेना सोडावी लागली, असे सगळेजण खासगीत आणि जाहीरपणे सांगतात. त्या मिलिंदचे नक्की काय साटेलोटे आहे, ते एकदा बाहेर आले पाहिजे. शिवसेनेच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना, सर्वसामान्य नागरिकांना हा मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचण्यात आडकाठी का घालतो, त्याचा काय स्वार्थ आहे ही विवंचना कायम आहे. एकदा तरी मिलिंद नार्वेकर नावाच्या त्या झारीतील शुक्राचार्याने आपली भूमिका स्पष्ट करावी. उद्धव ठाकरे यांना हे तमाशे शिवसेनेत चालतातच कसे? ते मिलिंदला याचा जाब का विचारत नाहीत, त्याच्यावर कारवाई का करत नाहीत? पण केव्हातरी याही नार्वेकराला शिवसेनेतून जावे लागेल, असे जुनेजाणते व अन्यायग्रस्त शिवसैनिक खासगीत पण तीव्र संतापाने सांगत असतात.
आता तर बबनराव घोलपांना पक्षातून कायमस्वरूपी काढावेच लागेल. कारण, त्यांची आमदारकी तर जाणारच आणि लोकसभेची उमेदवारीही. हे असे फटके आणि धक्के शिवसेनेला केवळ लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीपूर्वीच बसले आहेत, असे नाही. त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आणि अगदी पोटनिवडणुकीपूर्वीही बसले आहेत. त्यातूनही पक्ष प्रमुख काहीच बोध घेत नाहीत. ते आपल्याच नादात, आपल्याच विश्वात, आपल्याच कुटुंबात, आपल्याच छंदात मग्न असतात, असे दिसल्यावर कार्यकर्ते चिडणार नाहीत तर काय! मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची त्यांचे सध्याचे पक्षश्रेष्ठी कसा हिरमोड करतात ते सगळेजण रोजच्या रोज अनुभवत आहेत. तरीही अडवाणी अधूनमधून हट्टीपणा करून आपले हित साधतात, पण मनोहर जोशी तर पार तळाला फेकले गेले आहेत. वयाची 80 आली तरी त्यांना राजकारणाचा मोह सुटलेला नाही. काहीही करा, पण मला संसदेत पुढच्या किंवा मागच्या दाराने पाठवा, अशी आर्जव करणार्या पंतांचा तर सेनेत वेळोवेळी अपमानही झाला आहे. तरीही ते पालीसारखेच पक्षाला चिकटले आहेत. का, ते त्यांचं त्यांनाच माहीत.
बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना ही मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी, भांडणारी, चाळसंस्कृतीवाल्यांची शिवसेना राहिली नाही. ती सेटींगबाजांची, कॉलमबहाद्दुरांची आणि फोनाफोनी मास्टर पाकीटबाजांची शिवसेना झाली आहे. ती ‘चाळ व टाळ’; संस्कृतीपेक्षा ‘टॉवर आणि पॉवर’;च्या आहारी गेली आहे. केव्हा केव्हा तर ती पवारांच्याही आहारी गेली की काय, अशी शंका येते. त्यावर सोयीस्करपणे डोळेझाक करून महाराष्ट्रातील मराठी माणूस आशाळभूतपणे पाहतो तेव्हा त्याला जाणवतं की जसा लालबाग परळ हा मराठमोळा गिरणगावाचा प्रदेश परप्रांतीय धनदांडग्यांच्या हाती गेला, तसाच शिवसेना नावाचा मराठमोळ्यांच्या स्वाभिमानाचा, स्वामित्वाचा आणि हक्काचा पक्ष, संघटनेच्या चाकोरीतून बाहेर पडून धंदेवाईक नेत्यांच्या हाती सामावला आहे.
शिवसेना संपली नाही, पण तिची संपण्याकडे वाटचाल सुरू आहे. आदित्य ठाकरे जेव्हा आपला चुलत काका राज ठाकरे यांना शह देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांच्या राजकारणाची बालमती, अपरिपक्व बालबुद्धी सामोरी येते. परवा ठाण्याचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार एकाच शब्दात शिवसेनेची इज्जत काढून गेले. यू ट्युबला ते वाक्य सातत्याने हॅमर केलं जात आहे, ‘सुपारीबाज.. हप्तेखोर शिवसेना’. या शब्दातील खरंखोटं आम्हाला माहीत नाही, पण जेव्हा हा आमदार जबाबदारीपूर्ण जाहीरपणे असे उद्गार काढतो, तेव्हा त्यातील तथ्य समजून घ्यायला पाहिजे. शिवसेनेच्या नेत्यांनी, जिल्हाप्रमुखांनी, संपर्क प्रमुखांनी, अगदी युवासेना अध्यक्षांनी व पक्ष प्रमुखांनीही त्या शब्दांची दखल घेतलेली नाही. असे का? या प्रश्नाला उत्तर नाही. ते कोणी देऊही नये, घेऊही नये.
तूर्तास, या महाराष्ट्र प्रांतात ना शिवसेनेचा दबदबा उरला आहे, ना मनसेचा, ना राष्ट्रवादीचा, ना पवारांचा, ना चव्हाणांचा, ना काँग्रेसचा, ना आप चा, ना केजरीवालांचा. महाराष्ट्र आता अशा नेतृत्वाच्या आणि अशा पक्षाच्या प्रतिक्षेत आहे की जो या खर्या अर्थानं आम आदमीला म्हणजेच सर्वसामान्य मराठी माणसाला न्याय देईल.
महाराष्ट्र प्रांतात तुर्तास तरी रणांगणावर उधाण आले आहे महाराजा, आणि यात कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार. कोणी बघता बघता गल्लीतून दिल्लीत जाणार तर कोणी दिल्लीचे स्वप्न पाहता पाहता तुरुंगात खितपत पडणार. काळ सर्वात मोठा विश्लेषक असतो. त्याच्याकडे सर्व रोगांवर, आजारांवर उपाय आहे. तो वेळच्या वेळी सारं घडवतो, तोच पसारा मांडतो आणि तोच सारं मोडून तोडून मोकळा होतो. त्याच्या तडाख्यात सापडलेले मग राजकीय आणि सामाजिक पटलावरूनही नाहिसे होतात. महाराष्ट्रात सध्या अशी प्रकरणे वाढीस लागली आहेत. निमित्त आहे ते निवडणुकांचे. पण सुमारे 70 हजार कोटी रुपयांच्या सट्टाबाजारात दिल्लीत कोणाचे सरकार आणि महाराष्ट्रातून कोणाचे किती उमेदवार, यावर हा खेळ भरकटतो आहे.
या वावटळीत 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण अशा वल्गना करणार्या शिवसेनेचे पानिपत होत आहे. शिवसेना सोडून खासदार, आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते दूर जात आहेत. आजवर ते आपल्याकडे होते तेव्हा त्यांचे गुण-अवगुण दिसले नाहीत. पण ते सोडून जाताच ते गद्दार होते, असा साक्षात्कार शिवसेनेतील धेंडांना लागला आहे. मुळात शिवसेना आता बाळासाहेबांच्या निधनानंतर ‘पोरकी’ व सर्वसामान्य शिवसैनिकांना ‘परकी’च झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व नेभळट आणि बालिश असल्याची टीका हा पक्ष सोडून परपक्षात प्रवेश घेणार्या माजी शिवसैनिकांनी केली आहेच. यंदाची लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी महायुती सज्ज असल्याचा दावा केला जातो आहे, ती महायुती आतून किती पोखरली आहे, ते न दिसण्याएवढे मतदार दुधखुळे नाहीत. महागाई, भ्रष्टाचार, सुरक्षितता वगैरे तेच तेच पठडीतले मुद्दे घेऊन केंद्रात बदल घडवण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती प्रयत्न करणार, असे चित्र उभे केले जात आहे.
पण मध्यंतरी शिर्डीतून खासदार भाऊसाहेब वाघचौरे शिवसेना सोडून गेले, शिर्डीतून उमेदवारी मिळालेले बबनराव घोलप यांना तर 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. साईबाबांची शिर्डी शिवसेनेला यंदा तरी धार्जिणी नाही. पण मुख्य मुद्दा असा आहे की, भष्टाचारी बबनराव घोलप यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगवास होतो, तोही त्यांनी 1999 मध्ये महाराष्ट्रातील युती सरकारच्या काळात केलेला असतो, त्यावेळी ते समाजकल्याण मंत्री असतात, गेली 14 वर्षे त्या भ्रष्टाचार प्रकरणाचा ससेमिरा त्यांच्या मागे असतो, अशा वेळी, अशा काळात शिवसेनेचे दिग्गज नेते, जे भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठवण्याच्या पोकळ गर्जना शिवतीर्थावर आणि दादरच्या शिवसेना भवनातून देतात, त्यांना यंदा जनतेसमोर तोच मुद्दा घेऊन येण्यास कुठले तोंड उरले आहे? अण्णा हजारे यांनी वारंवार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा यांच्या नेत्यांची पाळेमुळे खोदून त्यांच्या भ्रष्टाचारी प्रकरणाची अगदी पुराव्यांसकट तक्रार केली होती. त्यात त्यांची कितीतरी वर्षे खर्ची पडली. त्यापैकी काही नेत्यांवर कारवाई झाली, काही जण मोकळे सुटले, काहीजणांना पक्षाने पदराआड घेऊन बचाव केला. काही ठिकाणी अण्णाच उघड पडले तर काही ठिकाणी भ्रष्टाचारी नेत्यांपेक्षा पक्षाची नाचक्की झाली. असे हे खेळ बरेच रंगले या काळात.
पण जेव्हा बबनराव घोलपांचा घोळ समोर आला तेव्हा मात्र शिवसेना नेते संभावितासारखे वागू लागले. त्यांनी आपल्या मतदारांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात शिवसेना आपले उमेदवार उभे करून लोकसभेसाठी इतर राज्यातही आपण सज्ज असल्याचा देखावा उभा करण्यात मशगुल झाले होते. मघाशी म्हटले त्याप्रमाणे शिवसेनेच्या पायाखालची वाळू निसटत चालली आहे. अशावेळी जुनी जाणती अनुभवी माणसं त्यांना नकोशी झाली आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. भाऊसाहेब वाघचौरे, उदय दुधगावकर, आनंद परांजपे, गजानन बाबर, राहुल नार्वेकर, मोहन रावले, अभिजीत पानसे, रवींद्र माने, त्याआधी भास्कर जाधव, राज ठाकरे, नारायण राणे, सतीश प्रधान, गणेश नाईक, छगन भुजबळ असा इतिहास आहे, या मंडळींनी शिवसेना सोडली व इतर पक्षांची कास धरली. प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे यांच्यासह मिलिंद नार्वेकर यांचेही नाव पुढे यायचे. याच मिलिंद नार्वेकरमुळे आम्हाला शिवसेना सोडावी लागली, असे सगळेजण खासगीत आणि जाहीरपणे सांगतात. त्या मिलिंदचे नक्की काय साटेलोटे आहे, ते एकदा बाहेर आले पाहिजे. शिवसेनेच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना, सर्वसामान्य नागरिकांना हा मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचण्यात आडकाठी का घालतो, त्याचा काय स्वार्थ आहे ही विवंचना कायम आहे. एकदा तरी मिलिंद नार्वेकर नावाच्या त्या झारीतील शुक्राचार्याने आपली भूमिका स्पष्ट करावी. उद्धव ठाकरे यांना हे तमाशे शिवसेनेत चालतातच कसे? ते मिलिंदला याचा जाब का विचारत नाहीत, त्याच्यावर कारवाई का करत नाहीत? पण केव्हातरी याही नार्वेकराला शिवसेनेतून जावे लागेल, असे जुनेजाणते व अन्यायग्रस्त शिवसैनिक खासगीत पण तीव्र संतापाने सांगत असतात.
आता तर बबनराव घोलपांना पक्षातून कायमस्वरूपी काढावेच लागेल. कारण, त्यांची आमदारकी तर जाणारच आणि लोकसभेची उमेदवारीही. हे असे फटके आणि धक्के शिवसेनेला केवळ लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीपूर्वीच बसले आहेत, असे नाही. त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आणि अगदी पोटनिवडणुकीपूर्वीही बसले आहेत. त्यातूनही पक्ष प्रमुख काहीच बोध घेत नाहीत. ते आपल्याच नादात, आपल्याच विश्वात, आपल्याच कुटुंबात, आपल्याच छंदात मग्न असतात, असे दिसल्यावर कार्यकर्ते चिडणार नाहीत तर काय! मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची त्यांचे सध्याचे पक्षश्रेष्ठी कसा हिरमोड करतात ते सगळेजण रोजच्या रोज अनुभवत आहेत. तरीही अडवाणी अधूनमधून हट्टीपणा करून आपले हित साधतात, पण मनोहर जोशी तर पार तळाला फेकले गेले आहेत. वयाची 80 आली तरी त्यांना राजकारणाचा मोह सुटलेला नाही. काहीही करा, पण मला संसदेत पुढच्या किंवा मागच्या दाराने पाठवा, अशी आर्जव करणार्या पंतांचा तर सेनेत वेळोवेळी अपमानही झाला आहे. तरीही ते पालीसारखेच पक्षाला चिकटले आहेत. का, ते त्यांचं त्यांनाच माहीत.
बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना ही मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी, भांडणारी, चाळसंस्कृतीवाल्यांची शिवसेना राहिली नाही. ती सेटींगबाजांची, कॉलमबहाद्दुरांची आणि फोनाफोनी मास्टर पाकीटबाजांची शिवसेना झाली आहे. ती ‘चाळ व टाळ’; संस्कृतीपेक्षा ‘टॉवर आणि पॉवर’;च्या आहारी गेली आहे. केव्हा केव्हा तर ती पवारांच्याही आहारी गेली की काय, अशी शंका येते. त्यावर सोयीस्करपणे डोळेझाक करून महाराष्ट्रातील मराठी माणूस आशाळभूतपणे पाहतो तेव्हा त्याला जाणवतं की जसा लालबाग परळ हा मराठमोळा गिरणगावाचा प्रदेश परप्रांतीय धनदांडग्यांच्या हाती गेला, तसाच शिवसेना नावाचा मराठमोळ्यांच्या स्वाभिमानाचा, स्वामित्वाचा आणि हक्काचा पक्ष, संघटनेच्या चाकोरीतून बाहेर पडून धंदेवाईक नेत्यांच्या हाती सामावला आहे.
शिवसेना संपली नाही, पण तिची संपण्याकडे वाटचाल सुरू आहे. आदित्य ठाकरे जेव्हा आपला चुलत काका राज ठाकरे यांना शह देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांच्या राजकारणाची बालमती, अपरिपक्व बालबुद्धी सामोरी येते. परवा ठाण्याचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार एकाच शब्दात शिवसेनेची इज्जत काढून गेले. यू ट्युबला ते वाक्य सातत्याने हॅमर केलं जात आहे, ‘सुपारीबाज.. हप्तेखोर शिवसेना’. या शब्दातील खरंखोटं आम्हाला माहीत नाही, पण जेव्हा हा आमदार जबाबदारीपूर्ण जाहीरपणे असे उद्गार काढतो, तेव्हा त्यातील तथ्य समजून घ्यायला पाहिजे. शिवसेनेच्या नेत्यांनी, जिल्हाप्रमुखांनी, संपर्क प्रमुखांनी, अगदी युवासेना अध्यक्षांनी व पक्ष प्रमुखांनीही त्या शब्दांची दखल घेतलेली नाही. असे का? या प्रश्नाला उत्तर नाही. ते कोणी देऊही नये, घेऊही नये.
तूर्तास, या महाराष्ट्र प्रांतात ना शिवसेनेचा दबदबा उरला आहे, ना मनसेचा, ना राष्ट्रवादीचा, ना पवारांचा, ना चव्हाणांचा, ना काँग्रेसचा, ना आप चा, ना केजरीवालांचा. महाराष्ट्र आता अशा नेतृत्वाच्या आणि अशा पक्षाच्या प्रतिक्षेत आहे की जो या खर्या अर्थानं आम आदमीला म्हणजेच सर्वसामान्य मराठी माणसाला न्याय देईल.

