Pages

Tuesday, 29 September 2015

लालबागचा राजा मंडळाला 38 लाखांचा दंड

  • कोट्यवधींचा कथित भ्रष्टाचार व गैरप्रकारांना जबाबदार असणार्‍या सुधीर साळवींची हकालपट्टी करा : महेश वेंगुर्लेकरांची मागणी
  • पालिका लालबागच्या राजा मंडळावर का करतेय मेहरबानी? एक विभाग दंड आकारते एक विभाग सूट देते, सहआयुक्त देसाईंची चौकशी करा!
  • राजाच्या दरबारात भक्तांना जाच : गर्दीत महिलेचा मृत्यू
  • दर्शनावेळी तरुणीला चोपले, रात्रभर चौकीत बसवून ठेवलं, 1200 रुपयांचा दंड केला वसूल
  • पोलिसांनीच घेतला कायदा हातात; पत्रकारांना गुन्हेगारासारखी वागणूक का?
  • महिला पत्रकार वृत्तसंकलन करत असताना केली मारहाण


लालबागच्या राजा मंडळाला खड्डयांसाठी 2007 ते 2012 पर्यंत मुंबई महानगरपालिकेने सूट दिली होती. मात्र 2012 पूर्वी पालिकेच्या अधिकार्‍यांबरोबर गैरवर्तवणूक झाल्यानंतर लालबागच्या राजाच्या दंडाची फाईल पुन्हा पुढे आली आहे. 2012 पासून ते आतापर्यंत 38 लाख 13 हजार 820 रुपये दंड आकारण्यात आला आहे. हा दंड पालिकेच्या परळ येथील एफ वॉर्ड विभागाने आकारला आहे, याची नोटीस आज मंडळाला बजावण्यात आली आहे.

भायखळा अंतर्गत येणार्‍या ई विभागातून जाणारा टी. बी. मार्ग ते आंबेडकर मार्गापर्यंत खड्डे करण्यात आले आहेत. हे खड्डे दर्शनासाठी असल्याचे लालबागचा राजा मंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र या मार्गाचा वापर दर्शनासाठी झालाच नाही. विनाकारण रस्त्यांवर खड्डे करून सर्वसामान्यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालवला होता. या खड्डयांसाठी पालिकेने लालबागच्या राजा मंडळावर दंड आकारणी केलीच नाही. अशी माहिती आरटीआय मधून प्राप्त झाली आहे. आत्तापर्यंत पालिकेच्या ई विभागाकडून अशी दुतर्फी भूमिका घेतली जात आहे. एक विभाग दंड वसूली आकारते तर दुसरा विभाग दंड वसुली करण्याकडे कानाडोळा करते. लालबागचा राजा मंडळावर अशी मेहरबानी का? असा प्रश्‍न करीत जाणीवपूर्वक ढिसाळ कारभार करणारे पालिकेचे सहआयुक्त देसाई यांची याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी केली आहे.

लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव व शिवसेनेचे शिवडी विभागाचे संघटक सुधीर साळवी व त्यांच्या कार्यकारणीतील सर्वांनी कोट्यवधींची कथित माया जमविली आहे, येथे झालेला महिलेचा मृत्यू, महिला पत्रकाराला झालेली मारहाण, भाविक महिलेशी केलेली उद्धटपणे वागणूक व मारहाण या सर्व प्रकरणाला मंडळाचा सचिवांचा ढिसाळपणा कारणीभूत आहे. यामुळे साळवी यांची त्वरीत हकालपट्टी करण्यात यावी व या सर्व प्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते व ज्येष्ठ समाजसेवक महेश वेंगुर्लेकर यांनी केली आहे.

दर्शनावेळी तरुणीला चोपले
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी व्हिआयपी रांगेत घुसलेल्या तरुणीला दर्शन महागात पडले आहे. मुंबई पोलिसांनी या तरुणीला चांगलाच चोप दिला. महिला पोलिस तरुणीला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी तरुणीला मारहाण केली त्यानंतर तिला काळाचौकी पोलिस स्टेशनमध्ये नेऊन तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि 1200 रुपये दंड वसुल करण्यात आला.
माझ्या आईला शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली, तिचे कपडे फाडणार्‍या पोलिसांना शिव्या का देऊ नये, असा संतप्त सवाल लालबाग राजाच्या दरबारात पोलिसांच्या मारहाणीला बळी पडलेल्या तरुणी नंदिनी गोस्वामी हिने विशेष मुलाखतीत विचारला.
लालबाग राजाच्या व्हीआयपी रांगेत घुसणार्‍या नंदिनीला पोलिसांनांकडून मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी नंदिनीने पोलीस आणि लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांवर अनेक आरोप केले. ‘पैसे घेऊन अनेकदा दर्शनासाठी सोडले जाते असाही खळबळजनक आरोप नंदिनीने केला आहे.
मीरा रोडमध्ये राहणारी नंदिनी आपल्या कुटुंबासमवेत लालबागच्या राजाच्या दर्शनाला आली होती. पण त्याचवेळी पोलिसांशी झालेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिसांनी तिला आणि तिच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली होती.

महिला पत्रकाराशी हुज्जत घालत केली मारहाण
लालबागच्या राजाचे मोबाईल शुटींग करणार्‍या महिला पत्रकाराला अरेरावी करीत तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणाची दखल घेत दोषी पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांना शोधून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
तरुण भारतच्या महिला पत्रकार पुनम अपराज या रात्रीच्या सुमारास लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांच्या लागलेल्या रांगेचे मोबाईलवरून शुटींग करीत होत्या. बंदोबस्तावरील काही पोलीस कर्मचारी हे त्यांच्या सहकार्‍यांना आतमध्ये सोडत होते मात्र, याचवेळी ते गणेशभक्तांना आतमध्ये सोडण्यास मज्जाव करीत होते.
पुनम यांनी याप्रकरणाचे मोबाईलवरून शुटींग करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी अपराज यांनी संबंधित पोलिसांना हटकले असता, पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना उलट उत्तरे दिली. या प्रकारानंतर अपराज या घरी जाण्यासाठी निघाल्या असताना एक महिला पोलीस कर्मचारी आणि काटकर नामक पोलीस उपनिरीक्षकांनी त्यांना अडविले. तसेच पुनम यांच्याशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की करीत त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. यानंतर पोलिसांनी त्यांना लालबाग येथील पोलीस चौकीत आणले. या प्रकाराची पुनम यांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यास नकार दिला.
दरम्यान, याप्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना मिळताच त्यांनी तात्काळ पुनम यांच्याशी गैरवर्तणूक करणार्‍या पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांची चोकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याप्रकरणी पुनम या पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यास सांगितले आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त जावेद अहमद यांनी 48 तासांत रिपोर्ट देण्यास सांगितले आहे. दुसरीकडे पोलिसांचे म्हणणे आहे, की तरुणीला वारंवार नकार दिल्यानंतरही तिने व्हीआयपी रांगेत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी नकार दिल्यानंतर तिने वाद घातला.

दोषींवर कडक कारवाई करणार
गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी हे गंभीर प्रकरण असल्याचे सांगत पोलिसांना दोन दिवसांमध्ये अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी याचा तपास करत असल्याचे ते म्हणाले. यात दोषी आढळलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल असेही शिंदे म्हणाले. मुंबई पोलिस सह आयुक्त देवेन भारती यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हिडिओ क्लिप मागवून पोलिसांची ओळख पटवण्यात येत आहे. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे भारती यांनी सांगितले.

व्यापार्‍यांची पोलिस जाचाची तक्रार
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी आवरण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात प्रचंड वाढ केली आहे. याचा फटका बसलेल्या स्थानिक व्यापार्‍यांनी पोलिसांवर मुजोरीचा आरोप केला होता. त्याविरोधात थेट हायकोर्टात धाव घेण्याचा इशारा लालबाग व्यापारी असोसिएशनने दिला आहे.
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भक्त येतात. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येतो. मात्र यंदा याचा स्थानिक दुकानदारांना त्रास होऊ लागला आहे. पोलिसांनी बंदोबस्ताच्या नावाखाली रस्तेच अडवले आहेत. आमचे ग्राहक, व्यापारी, पाहुणे आत येऊच शकत नाही. पोलिस समजून घेण्याच्या मन:स्थितीतच नसतात. त्यामुळे याविषयी आम्ही लवकरच बैठक घेऊन निर्णय घेणार आहोत. हायकोर्टात जाण्याचाही विचार करणार आहोत, असे लालबाग व्यापारी असोसिएशनचे खजिनदार घेवरचंद कोठारी यांनी सांगितले.

गर्दीत महिलेचा मृत्यू
भाविकांसाठी सर्वतोपरी सोय केलेली आहे अशा बाता लालबागच्या राजा मंडळाकडून केल्या गेल्या. मात्र त्या हवेतच विरल्याचा प्रत्यय नुकताच आला आहे. उषाबेन पारेख नामक एक 50 वर्षीय महिला राजाच्या दर्शनासाठी सोमवारी लालबागला आली होती. सोमवारी दर्शनासाठी उभ्या असलेल्या पारेख यांना गुदमरल्यासाखे झाले आणि त्या भोवळ येऊन कोसळल्या. मात्र लालबागच्या राजा मंडळाकडे त्यांना प्रथमोपचारासाठी कोणत्याही प्रकारची सोय नव्हती. विशेष म्हणजे केईएम रुग्णालयाकडून जी रुग्णवाहिका पाठवण्यात आली होती ती अत्यंत साधी होती. त्यात कोणत्याही प्रकारची सोय नव्हती. लालबागच्या राजा मंडळाच्या निष्क्रियतेमुळे एका 50 वर्षीय महिलेला आपले प्राण गमवावे लागले. 
याबाबत महिलेच्या कुटुंबियांनी लालबागच्या राजा मंडळावर आरोप केले आहेत. उषाबेन यांची मुलगी अपेक्षा हिने आपल्या आरोपात म्हटले आहे की, सोमवारी सांयकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी माझी आई चक्कर येऊन कोसळली. मात्र मंडळाकडून कोणत्याही प्रकारे उपचाराची घाई करण्यात आली नाही. आमच्या कानावर थेट आईच्या मृत्यूची बातमी आली. उपचारासाठी केईएमला नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर जर भक्तगण येत असतील तर लालबाग मंडळाची ही जबाबदारी आहे त्यांच्या सुविधा व्यवस्थितपणे पुरवण्याची. मात्र मंडळाचा ह्या गलिच्छ व्यवस्थेने आज मी माझ्या आईला गमावले आहे.

वाजाने केला निषेध
देशातील पत्रकार आणि लेखकांसाठी एक व्यासपीठ असलेल्या रायटर्स अ‍ॅण्ड जर्नालिस्ट असोसिएशन अर्थात वाजाने महिला पत्रकार पूनम अपराजवरील हल्ला, तिला झालेली मारहाण आणि पोलीस अधिकार्‍यांद्वारा बेकायदेशीररित्या तिच्याकडून झालेली दंडवसूली करण्याच्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. 
या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी वाजाने आपल्या कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी वाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष अभिजीत राणे, मुंबई अध्यक्ष कमलेश वैष्णव, वाजा सदस्य आणि विद्रोही पत्रकार तानाजी कांबळे, हरीश भानुशाली, शिवा सिंह, सुधीर नायर, अश्‍विनी भानुशाली आदी उपस्थित होते. 

वाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष अभिजीत राणे यांनी सदर घटना अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटले आहे. एका धार्मिक ठिकाणी एका महिला पत्रकाराबरोबर अशा प्रकारचे वर्तन पोलीस कर्मचार्‍यांकडून होते हे अत्यंत निंदनीय आहे. या घटनेची जितकी निंदा करावी तितकी कमीच आहे. महिला पोलीस कर्मचार्‍यांना त्वरित अटक करून महिला पत्रकाराकडून दंडवसूली करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

लालबागच्या राजाच्या अध्यक्षांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, लालबाग राजाचे  उत्पन्न 15 कोटी तर खर्च 7 ते 8 कोटी आहे. हा राजा किती लोकांच्या नवसाला पावतो याची कल्पना नाही, परंतु या संस्थेच्या अधिकार्‍यांना मात्र राजा नक्कीच पावला असेल, असे दिसते. परंतु अनेकदा या पैशामुळे मस्ती येते आणि यामुळे भाविकांच्या जीवावर आपलं राज्य करतो, त्या भाविकांनाच हाणामारीचा प्रसाद दिला जातो. हे अत्यंत निंदनीय असून समस्त भाविकांनी देवादेवांमध्ये उच्च-नीच करण्याच्या प्रवृत्तीचा बीमोड केला पाहिजे आणि श्रीमंत राजाच्या अतिश्रीमंत मालकांचे डोके ताळ्यावर आणले पाहिजेत.
-हेमंत देसाई, ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक  

उन्मेष गुजराथी 

Friday, 25 September 2015

नाशिकच्या रामकुंडातील तीर्थात घालणार मक्का-मदीना आणि व्हॅटिकनचे पाणी

हिंदूंसह मुसलमानही संतापले; जातीय दंगल उसळण्याची शक्यता
एमआयटीच्या संस्थाचालकांची स्टंटबाजी

'येनकेन प्रकारेण' प्रसिध्दीचा कंडू शमवू पाहणार्‍या पुण्यातील एका संस्थाचालकाने चक्क नाशिकच्या पवित्र रामकुंडात मक्का, मदिना यासह व्हॅटिकन सिटीतले पाणी मिसळण्याचा सोहळा शुक्रवारी सकाळी 9 वाजता आयोजित केला आहे. यामुळे हिंदूच काय पण मुसलमान व ख्रिश्‍चन धर्मियांमधील भाविकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. मात्र दुदैवाची बाब म्हणजे सर्वच धार्मिक व राजकीय संघटना याबाबत अद्यापही मूग गिळून गप्प आहेत.

पुण्यातील एमआयटीचे संस्थाचालक प्रा. विश्‍वनाथ कराड यांच्या 'सुपिक' डोक्यातून ही स्टंटबाजीची कल्पना आली आहे. नाशिकचे पवित्र रामकुंड जगभरात प्रसिध्द आहे. कुंभमेळ्यात तर येथे लाखो भाविक स्नान करून पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करतात. या पवित्र नदीत केदारनाथ, बद्रिनाथ, मानसरोवर, अमरनाथ, अयोध्या, काशी, पुष्कर, बोधगया यांसह मुसलमानांच्या दृष्टीने 'पाक' म्हणजे पवित्र असणार्‍या मक्का, मदिना तर ख्रिश्‍चनांच्या 'होली' म्हणजे पवित्र असणार्‍या नद्यांचे पाणी एकत्र करून अर्पण करण्यात येणार आहे.

हिंदूंच्या दृष्टीने मक्का, मदिना व व्हॅटिकन सिटी येथील नद्यांच्या पाण्याने स्नान करणे हे निषिध्द व धर्मशास्त्राला छेद देणारे आहे. तर मुसलमानांच्या दृष्टीने मक्का, मदिनेच्या नद्यांतील पाण्याने हिंदूंनी स्नान केले तर त्यांच्या पाकजलाचा ते अपमान करणारे व धर्मशास्त्राला बाधक असे कृत्य आहे. या 'पाक' जलात हिंदूंनी पाय ठेवल्याने ते नापाक होणार आहे. यामुळे हिंदूंसह मुसलमानांच्या भावनांनाही ठेच लागली आहे.
गंगा नदी ही सर्व पावनी आहे. म्लेच्छांच्या स्पर्शाने ती दूषित होते. त्यामुळे सर्वधर्मतीर्थ कुशावर्त येथे मक्का,मदीना येथील नद्यांमधील पाणी टाकल्यास गंगा (म्हणजेच गोदावरी) दूषित होऊ शकते, म्हणून यास आमचा विरोध आहे.  
- शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती
सर्व ठिकाणचे तीर्थ विशेषरुपाने एकत्र करुन ते मंदिरात टाकण्याची कोणतीही कृती हिंदु धर्मात सांगितलेली नाही, असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे सरकारने सर्वधर्मतीर्थ येथील सुप्रसिध्द श्री काळाराम मंदिर, पवित्र रामकुंड आणि त्र्यंबकेश्‍वर येथील पवित्र कुशावर्त येथे टाकले जाण्यापासून रोखावे. सर्वधर्माचे तीर्थ एकत्र करुन ते मंदिरात वा कुशावर्त येथे टाकणे, हे सनातन हिंदू धर्माच्या विरुध्द आहे. ही एक प्रकारची नाटकबाजी आहे. केवळ मंदिरातच टाकले जाते, मात्र एखादी मशीद  व चर्च येथे टाकण्यास जाऊ दिले जात नाही. सर्वजण सर्व धर्मांचा आदर करतात; मात्र काही मंडळींकडून आम्ही सर्वधर्मसमभावी आहोत, हे दाखवण्याचा केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. 
- श्री महंत नरेंद्रगिरीजी महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद
मुसलमान धर्मामध्ये पवित्र पाण्याला 'आल ए झम झम' म्हणतात. ते पवित्र पाणी प्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यात येते. रामकुंडात हे पाणी टाकणे, म्हणजे त्याचा दुरुपयोग करण्यासारखे आहे. या पाण्याने आंघोळ करणे, हे तर इस्लाम धर्माच्या विरुद्ध आहे. हा मुस्लीम भाविकांचा अपमान आहे. -मुक्तार आदील, सरचिटणीस, उर्दु मिडीया सेंटर
नद्यांचं पाणी विविध ठिकाणांहून आणणे, ही तर भारतातील प्राचीन संस्कृती आहे. भारत हे तर जगातील ज्ञानाचे उगमस्थान आहे. नद्यांचं पाणी आणणं, याला प्राचीन संदर्भ आहे. मात्र मक्का, मदिना, व्हॅटिकनमधून पाणी आणून काय साध्य होणार ? मुसलमान व ख्रिश्‍चनांच्या विचारधारेशी हिंदूंची विचारधारा एक होणार आहे का?  हा संपूर्ण मूर्खपणाचा व पाब्लिसिटी स्टंटचा प्रकार आहे. मात्र हा पायंडा अत्यंत घातक आहे. 
-डॉ. उदयकुमार पाध्ये, सामाजिक कार्यकर्ते
देशभरात ज्या ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो, त्या ठिकाणी देशातील पवित्र नद्यांचा संगम झालेला आहे. हिंदू धर्मात या नद्यांच्या संगमस्थळी शाहीस्नान करण्याची प्रथा आहे. प्रयाग अर्थात अलाहाबाद येथे गंगा, यमुना आणि लुप्त पावलेली सरस्वती नदी यांचा संगम होतो. त्या संगमाच्या ठिकाणी शाहीस्नान केले जाते. नाशिक येथे गोदावरी आणि गंगा नदी यांचा संगम होतो. पवित्र नद्यांच्या संगमाला येथे महत्त्व देण्यात आले आहे. अशा वेळी या संगमात मक्केतील पाणी मिसळून 'सर्वधर्मसंगम' ही भलतीच प्रथा रुढ करणे म्हणजे धर्मशास्त्राला छेद देण्यासारखे आहे.
- प्रा.चारुचंद्र उपासनी, सामाजिक कार्यकर्ते
हिंदू धर्म हा सहिष्णूतेची शिकवण देतो. यामुळे आम्ही एकवेळ हा  सर्व धर्माला छेद देणारा प्रकार सहन करु, मात्र  उद्या याच कथित सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदुस्थानातील नद्यांचे पाणी मक्का, मदिना व व्हाटीकन सिटीमधील लोकांच्या धर्मस्थळांमध्ये अर्पण केले तर ते तेथील भाविकांना आवडेल काय? 

Wednesday, 23 September 2015

जो तो उठतो आणि...

दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी... एका पाठोपाठ एक अ‍शा तीन विचारवंतांच्या हत्या झाल्या. आणि प्रत्येक वेळा संशयाची सुरी ‘सनातन’कडे वळली. अर्थात या प्रकरणांतील खरे आरोपी कोण याची अजून शहनिशा व्हायची आहे. पण त्याआधीच अनेकांनी ‘सनातन’वर बंदी घालायची मागणी लावून धरली आहे. कित्येकांना ‘सनातन’पासून त्यांच्या जीवाला धोका असल्याचा साक्षात्कार होऊ लागलाय.

सनातन म्हणजे ‘इसिस’च्या धर्तीवरील एखादी संस्था असावी, असेच एकंदर चित्र उभे करण्यात आलंय. इसिसमध्ये भरती होण्यासाठी जाणर्‍या तरुणांपेक्षा सनातनचा साधक समीर गायकवाड माध्यमांत जास्त गाजतोय. खरंच इतकी खतरनाक असेल सनातन संस्था, तर मग आज बंदीची मागणी करणारे स्वत: सत्तेत असताना गप्प का बसले होते? देशहिताच्या एवढ्या महत्त्वाच्या बाबीसाठी एवढा विलंब कशासाठी?

एकीकडे पोलिसांनी समीर गायकवाडचा उल्लेख ‘टफ नट टू क्रॅक’ असा केल्याच्या बातम्या येतात. त्याचा वकील सोबत असल्यामुळे पोलिसांना त्यांच्या खास पद्धतीने तपास करता येत नाही. त्यामुळे कारवाईला उशीर होतोय, असेही छापून येते. अर्थात अशा बातम्या एकंदरीत पोलिस तपासावरच प्रश्न चिन्ह उभे करतात. पोलिस तपास म्हणजे, ‘पोलिसी खाक्या दाखवून गुन्ह्याची कबुली घेणे नव्हे’ यावर अजुनही आमचा विश्वास आहे. असो.

तर सांगायचा मुद्दा असा की, जो तोंडच उघडत नाही. त्याच्या चौकशीतून अनेक गंभीर बाबी पुढे येत आहेत, हे मानायचे कसे? माध्यमांना अशा परस्पर विरोधी बातम्या कोण पुरवतंय? वागळेंच्या जीवाला धोका, हे पोलिसांनी अधिकृतपणे सांगितले आहे का? तसे असेल तर सगळ्याच माध्यमांनी तसं ठामपणे का सांगितले नाही? केवळ काही ठरावीक ठिकाणीच वागळेंनी पोलिस प्रोटेक्शन नाकारल्याची बातमी कशी? मुद्द्लात वागळेंना पोलिस प्रोटेक्शन दिलंच नव्हते तर त्यांनी ते नाकारलं तरी कसं? कोण अशा अ‍फवा पसरवतंय? आणि त्यामागची कारणं काय?
केवळ सनातन संस्थेला बदनाम करण्यासाठी हे सगळं चालले आहे का? सनातनला बदनाम करुन कोणाचा फायदा होणार आहे? का सनातनच्या आडून आज सत्तेत असलेल्या आणि हिंदुत्त्ववादी मानल्या जाणाऱ्या सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे? की एकूणच हिंदू धर्म बदनाम करण्याचा हा डाव आहे?

प्रश्न अनेक आहेत. मात्र त्यांची उत्तरे देणारे कुणी दिसत नाही. शीना बोरा प्रकरणात जसे तत्कालीन पोलिस आयुक्त राकेश मारिया वारंवार समोर येऊन माहिती देत होते, तसेच आताही पोलिस किंवा सरकारच्या प्रतिनिधींनी समोर येऊन खात्रीशीर महिती द्यायला हवी. नाहीतर जो तो उठतो आणि स्वत:ची प्रसिद्धीची पोळी भाजून घेतो, असे चित्र कायम राहील.

सन २००८ साली मुंबईत झालेले स्फोट आणि २००९ साली मडगाव- गोवा येथे झालेले स्फोट यांचा सनातनशी संबंध जोडण्याचा कॉँग्रेसवाले प्रयत्न करत आहेत. मुळात या दोन्ही घटनांचा पोलिस तपास हा कॉँग्रेसच्या सत्तेच्या काळात करण्यात आला आहे. या तपासातूनच न्यायालयाने या दोन्ही घटनांमधील सनातन संस्थेचा कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे असताना कॉँग्रेसचे नेते विखे पाटील आज कोणत्या आधारावर सनातनला आतंकवादी संघटना म्हणत आहेत.

Tuesday, 22 September 2015

लालबागचा राजाच्या मंडळाविरोधातील तक्रारी मागे घे, नाहीतर गोळ्या घालू!

आरटीआय कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांना धमकी   
(मुंबई) लालबाग येथील ‘लालबागचा राजा’च्या विश्वस्त मंडळाने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे, ज्येष्ठ सामाजिक व आरटीआय कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांना त्यांच्या कुटुंबियांसह गोळ्या घालून ठार मारण्याच्या धमक्या आल्याने त्यांनी स्वतःला व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षणाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

लालबागचा राजा विश्वस्त मंडळाचे मानद सचिव व शिवसेनेचे शिवडी येथील विभाग संघटक सुधीर साळवी व विश्वस्त मंडळातील सदस्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अफरातफरीची चौकशी करावी, असे तातडीचे आदेश मुंबई हायकोर्टाने चॅरिटी कमिशनला दिले होते.  इतकेच नव्हे तर या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेशही विधी व न्याय विभागाला दिले होते.

या सर्व आदेशांसाठी व या कथित भ्रष्टाचाराची माहिती आरटीआयमधून खणून काढण्यासाठी वेंगुर्लेकर यांनी मागील चार-पाच वर्षांपासून अथक परिश्रम केले होते. सरकारी दरबारी जोडे झिजवले होते, यामुळेच विश्वस्त मंडळावरील हे बालंट टळावे व अधिक चौकशी होऊ नये, यासाठीच आपल्याला गोळ्या घालण्याच्या धमक्या आल्याचे वेंगुर्लेकरांनी सांगितले. वेंगुर्लेकरांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक संजीव दयाळ व पोलीस आयुक्त जावेद अहमद यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

अब्रुनुकसानीचा दावा
‘लालबागचा राजा’च्या मंडळाने दै. मुंबई मित्र - वृत्त मित्रचे समूह संपादक अभिजीत राणे, कार्यकारी संपादक उन्मेष गुजराथी व आरटीआय कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. हा दावा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असून मंडळातील कथित भ्रष्टाचार बाहेर पडू नये, यासाठी जनतेच्या पैशातूनच हा दावा दाखल केला आहे. यासाठी कागदपत्रे, वकील करण्यासाठी करण्यात आलेला खर्च करताना धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेतली काय, असा सवालही वेंगुर्लेकर यांनी केला आहे. यासंदर्भात साळवी व पवार यांना प्रतिक्रियेसाठी वांरवार फोन केला असता, त्यांनी फोन न उचलणे पसंत केले.

तक्रारी मागे घे, नाहीतर...  
मंडळाच्या विरोधात केलेल्या तक्रारी मागे घे, आरटीआयचा पत्रव्यवहार त्वरीत थांबवा, नाहीतर तुला कुटुंबियासह गोळ्या घालू, अशी धमकी देण्यात आल्याचे वेंगुर्लेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.  मी व माझ्या कुटुंबियांचे बरे-वाईट झाल्यास मंडळाचे मानद सचिव, शिवसेनेचे शिवडी विभागाचे संघटक सुधीर साळवी, अध्यक्ष अशोक पवार यांना जबाबदार धरण्यात यावे, असेही वेंगुर्लेकर यांनी केलेल्या मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Saturday, 19 September 2015

सनातनपेक्षा आधी हिंस्र राजकीय पक्षांवर बंदी घाला !

सनातन उवाच : समीर गायकवाड निर्दोषच; सनातन संस्था त्याच्या पाठिशी ठाम!
राजकीय पाठिंब्याअभावीच सनातनची फरफट

(मुंबई) सनातन संस्था ही अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारी संघटना आहे. ती कोणाचाही राजकीय पाठिंबा घेत नाही, व तशी आम्हाला अपेक्षाही नाही. मात्र केवळ पाठिंबा नाही, म्हणून तथाकथित पुरोगामी हे पोलिसांवर दबाव आणून आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करायला भाग पाडतात, असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते संदीप शिंदे यांनी केला. मात्र त्याचवेळी समीर गायकवाड हा निर्दोष असून, संस्था त्याच्या पाठिशी ठाम उभी आहे, त्याचा पुनरुच्चारही शिंदे यांनी यावेळी केला.

विचारवंतांच्या हत्यांमुळे त्यांचे कुटुंबिय व चाहत्यांनी सरकार आणि पोलिसांवर आणलेला दबाव, हत्येकऱ्यांना केवळ हिंदुत्त्ववादी म्हणून सरकार पाठिशी घालण्याचा आरोप, मिडियाचा पोलिसांवर असणारा दबाव, यासंदर्भात विधानसभेत उठणारे तारांकित प्रश्न, या सर्व प्रकरणांना वैतागून सरकारने केवळ दिखावूपणासाठी समीर गायकवाडला संशयित म्हणून अटक केली, असा आरोपही शिंदे यांनी यावेळी केला.

समीरवरील आरोप अद्याप सिद्ध झाले नाहीत. पोलिसांवरील दबावतंत्रामुळे त्यांनी ही धरपकड केली असल्याचे सनातनने मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. पुरोगाम्यांना सर्व हिंदूंना धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे. पण त्यांच्याआड सनातन संस्था येत आहे. त्यामुळेच ते आमच्यावर बंदीची मागणी करीत आहेत, असे सनातनने यावेळी म्हटले. संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक, डॉ उदय धुरी आणि कायदेविषयक सल्लागार संजीव पुनाळेकर यावेळी उपस्थित होते.

पोलिसांवर हात उचलणाऱ्या रझा अकादमीवर बंदी का नाही? 
सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारे जितेंद्र आव्हाड, शाम मानव आणि दाभोलकर कुटुंबीय त्यावेळी कुठे होते? असा सवाल देखील सनातन संस्थेने केला आहे. जेव्हा रझा अकादमीच्या लोकांनी पोलिसांवर हात उचलला होता. देशात काहीही झाले तर थेट सनातनकडे बोट दाखवले जात आहे. सनातनने हिंदू जनजागृती केली. देशाभिमानासाठी काम केले. मात्र, पुरोगाम्यांना हे बघवत नसल्याचे सनातनने म्हटले आहे. तसेच देशातील तपास यंत्रणा या स्वत:ला पुरोगामी समजणाऱ्या लोकांच्या हातातील बाहुले झाल्याचा आरोपही यावेळी सनातनने केला. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल याला अटक केली. त्यावेळीही सनातनवर आरोप झाले. मात्र, त्यांचे पुढे काय झाले? असा सवाल देखील सनातनने केला. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर म्हणाले, आम्ही या संदर्भात तथाकथित पुरोगाम्यांच्या षडयंत्राला बळी न पडता निष्पक्षपणे तपास होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागण्याही केल्या आहेत.

सनातनपेक्षा आधी हिंस्र राजकीय पक्षांवर बंदी घाला !
पानसरे हत्येप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लीकन पक्ष आदी राजकीय विचारसरणीच्या लोकांनी सनातनवर बंदीची मागणी केली आहे. सनातनच्या एका साधकाला संशयित म्हणून अटक झाली; म्हणून सनातनवर बंदी घालण्याची मागणी होत असेल, तर प्रथम
1. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा सिद्ध झाला आहे; म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी घालावी.
2. शीखविरोधी दंगली घडवून सहस्त्रावधी निरपराध शिखांची कत्तल केल्याबद्दल काँग्रेस पक्षावर बंदी घालावी.
3. केरळमध्ये 250 स्वयंसेवकांची हत्या राजकीय कारणांसाठी केल्याची स्वीकृती देणाऱ्या एम. मणी यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर बंदी घालावी. 
4. अंनिसचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सिद्ध झाले असल्यामुळे त्यांच्यावर बंदी घालावी. 
असा स्वतःचा खुनी इतिहास ज्ञात नसलेल्या राजकीय पक्षांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणे, हे हास्यास्पद आणि लज्जास्पद आहे. म्हणून सनातनपेक्षा आधी हिंस्र राजकीय पक्षांवर बंदी घालावी, अशी 'सनातन'ची मागणी आहे.

सनातन संस्था ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याने, पुरोगाम्यांच्या दबावामुळे पोलीस सहजपणे संस्थेवर सातत्याने कारवाई करत आहेत. आम्हाला राजकीय वरदहस्ताची आवश्यकता नाही, आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, त्यामुळे ‘सत्यमेव जयते’च होईल !
- सनातन प्रवक्ता संदीप शिंदे

सनातनने मुख्यमंत्यां  कडे केलेल्या मागण्या: 
दाभोलकर-पानसरे प्रकरणात पुरोगाम्यांची एकांगी विचारसरणी लक्षात घेता त्यांच्या दबावाला बळी न पडता स्वतंत्रपणे तपास करावा आणि या हत्यांचे, सर्व पैलू तपासण्यात कसलीही कसर राहू नये, असे आदेश द्यावेत.
तपासाच्या दृष्टीने दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांच्या सूचनांवर कार्यवाही व्हावी; मात्र तपासदलाचे अनधिकृत नेतृत्व त्यांच्यावर सोपवण्याची चूक टाळावी. अन्यथा तपास भरकटून निष्पाप व्यक्तींना त्रास सहन करावा लागेल.
सनातन संस्थेला लक्ष्य करून आरोप करणाऱ्या काही व्यक्ती आणि संघटना यांची प्रवृत्ती अत्यंत संशयास्पद वाटते. तसेच सनातन संस्थेने त्यांचे आर्थिक घोटाळे उघड केले असल्यामुळे काही निष्कर्षांपर्यंत तपास यंत्रणा पोहोचू नयेत, या धडपडीतून सनातनला लक्ष्य केले जात आहे का, याचीही सखोल चौकशी व्हावी.
श्याम मानव यांची तपासकामातील लुडबुड थांबवावी आणि ते ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांचा उल्लेख करून स्वतःची शेखी मिरवत आहेत. त्यास आळा घालावा. 

सनातन संस्था ही आध्यात्मिक आणि राष्ट्रभक्त संघटना असून, कोणताही निष्कर्ष समोर आलेला नसतांना पुरोगाम्यांच्या बेछूट आरोपांमुळे संस्थेची नाहक बदनामी होत आहे. संस्थेने अनेक मंदिरांतील घोटाळे बाहेर काढण्यासह, पर्यावरण रक्षण, तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात विविध जनजागृती चळवळी शिस्तबद्धरीत्या राबवून, राष्ट्रीय स्तरावर कार्य उभे केले आहे. त्याला रोखण्याचे षड्यंत्रच या तथाकथित पुरोगाम्यांनी आखलेले दिसते. सनातन संस्था या आरोपांच्या वादळातून निश्चित तरून निघेल आणि समाजात राष्ट्रभक्ती रुजवण्याच्या कामी अधिक जोमाने कार्यरत होईल, याचा आम्हाला विश्वास आहे. या वेळी उपस्थित हिंदू गोवंश रक्षा समिती, राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ, श्री महाराष्ट्र रामलीला मंडळ या हिंदुत्ववादी संघटनांनीही सनातन संस्थेला जाहीर पाठिंबा दिला आणि हिंदुत्ववादी संघटनांवरील मानहानीच्या विरोधात संघटितपणे उभे रहाण्याचा मानस व्यक्त केला. 
अभय वर्तक, सनातन संस्था, प्रवक्ते  

व्यक्तिगत प्रसिध्दीसाठी सनातनवर आरोप केले जात आहेत. समीर हा निर्दोष आहेच पण एका कार्यकर्त्याला अटक झाली म्हणून संपूर्ण संस्थेला फाशी देणे योग्य नाही. तपासयंत्रणांनी पुरोगाम्यांच्या दबावाखाली ही कारवाई केल्याचा आरोप सनातनने केला. दाभोलकर, पानसरे हत्याप्रकरणात आम्ही तपास यंत्रणांना सहकार्य केलं आहे. तपास यंत्रणांना आम्ही महत्वाची माहिती दिली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले, असा दावाही सनातनने केला.

उन्मेष गुजराथी

Friday, 18 September 2015

समीर गायकवाड : आरोप आणि उठाठेव

समीर गायकवाडला अटक झाल्याची बातमी सगळ्यांनी रंगवून दिली. पण सनातनची बाजू कोण मांडणार? मी तसे करून पाहिले. आणि आज दिवसभर माझा फोन वाजत राहिला. मी सनातनचा साधक झालोय की काय अशी शंकाही कित्येकांना आली. पण असे काहीही झालेले नाही आणि यापुढेही होणार नाही याची खात्री असू द्या. 

पण तरीही पत्रकार म्हणून दोन्ही बाजू मांडणे मी माझे कर्तव्यच समजतो. त्यातली एक बाजू सगळ्यांनीच इतकी उचलून धरलीय, की त्यात आता नवीन सांगण्यासारखे काहीच नाही. म्हणूनच मी दुसऱ्या अ(ल्प)प्रकाशित बातमीला पुढे आणायचे ठरवले. 

गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत संबंधित व्यक्तीला निर्दोषच समजले जाते. पण आजकाल 'मिडिया ट्रायल'च्या नावाखाली व्यक्तीचा हा अधिकारच हिरावून घेतला जातोय. एकाच बाजूने बातमी रंगवून, आणि त्याचाच भडीमार केला जातोय. 

आता आजचेच उदाहरण घ्या. त्या समीर गायकवाडच्या घरात २३ मोबाईल, एक धारधार चाकू, सनातनचे प्रचार साहित्य सापडले. पण याचा कॉ. पानसरेंच्या हत्येशी काही संबंध सिद्ध झालाय का? 
मोबाईल म्हणजे बंदुका सापडल्या अशा थाटात आज सगळीकडे बातम्या देताहेत. अरे, मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्याकडे मोबाईल नाही तर काय मिसाईल सापडणार? 

एखाद्याची फुकट बदनामी करायची म्हणजे तरी किती? म्हणे घरात एक धारदार चाकू सापडला? कुणाच्या घरात नसतो चाकू? आणि चाकूला धार असतेच. त्या चाकूने हत्या केलीय का त्याने? 
सनातनच्या पूर्णवेळ साधकाकडे, सनातनच्या प्रचाराचे साहित्य नाहीतर काय बायबल आणि कुराण सापडणार ?

मग या रंगतदार बातम्या नक्की कशासाठी? आरोपी नक्की कोण हा मुद्दा नाहीच. जो असेल त्याला शिक्षा ही व्हावीच. पण ही उथळ उठाठेव नक्की कोणाच्या फायद्याची, याचाही विचार नको का करायला?


समीर गायकवाड बळीचा बकरा ?

कोल्हापूर येथील कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला समीर गायकवाड हा ‘सनातन’चाच पूर्णवेळ साधक असून तो निष्पाप अन् निर्दोष आहे, याचा वारंवार पुनरुच्चार सनातन संस्थेने विविध प्रसिद्धी माध्यमांतून केला आहे. यापूर्वीही डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या साधकांची चौकशी झाली. त्यांना नाहक बदनाम करण्याचे षडयंत्र करण्यात आले. मात्र यातून अद्याप काहीही निष्पन्न न झाल्यामुळे केवळ सनातन संस्थेमध्येच नव्हे तर संबंध हिंदुत्ववाद्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी 2 कोटी कॉल रेकॉर्ड्सवरून सनातनच्या साधकाचाच क्रमांक शोधून त्याला हेतूपूर्वक अटक केली असल्याचा आरोपही संस्थेने केला आहे.

याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी करीत सरकारच्या 'चोर सोडून संन्याशाला फाशी' या प्रवृत्तीचा सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. आपल्या या आरोपात संस्थेनेपुढे असे म्हटले की,  यापूर्वीही डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनच्या अनेक साधकांची चौकशी झाली होती. सनातनला यापूर्वीही अनेकवेळा झोडपण्यात आले आहे; परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

समीर गायकवाड यांना संशयावरून अटक करण्यात आली आहे. पोलीसही त्यांना संशयित असल्याचे म्हणत आहेत. लवकरच यामागील सत्य उघडकीस येईल. सनातनही आध्यात्मिक संस्था असल्याने ती प्रत्यक्ष कायदेशीर साहाय्य करू शकत नाही. समीर गायकवाड हे निष्पाप असल्याने त्यांना हिंदु विधीज्ञ परिषद किंवा अन्य हितचिंतक अधिवक्ता यांच्यामार्फत कायदेशीर साहाय्य पुरवण्यात येईल, अशी माहिती अॅड. संजीव पुनाळेकर यांनी दिली.

अटक संशयास्पदच
निष्पाप समीर गायकवाड याला गोवण्यासाठी पोलिसांनी बनाव रचला आहे. पोलिसांनी अशी थेट अटक करणे संशयास्पद आहे. एखाद्याला 24 तास चौकशी किंवा पडताळणी केल्यानंतर त्यांना पुढील 24 तासांत न्यायालयात हजर करायचे असते. त्यासाठी पोलिसांना काही तास बसून रिमांड कागदपत्रे बनवावी लागतात. येथे पहाटे अटक करून लगेच पोलिसांनी न्यायालयात हजर केले. याचाच अर्थ कागदपत्रे आधीच बनवण्यात आली होती. हा संपूर्ण बनाव आहे, हे यातून स्पष्ट होते. अटक झाल्यानंतर त्यांच्या परिवाराला कळवायचे असते. पोलिसांनी अटक केल्यानंतर काही तासांनी आई-वडिलांना कळवले, हे गंभीर आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

समीरसह त्याचे संपूर्ण कुटुंब आमचे साधक - सनातन
समीरच नव्हे तर त्याचे संपूर्ण कुटुंब आमचे साधक असून, त्याच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सनातनने म्हटले आहे. शिवाय समीरचे निर्दोशित्व सिद्ध करण्यासाठी गायकवाड कुटुंबाला कायदेशीर मदत करणार असल्याचेही संघटनेकडून सांगण्यात आले.

अशी घडली होती घटना
 15 फेब्रुवारीला सकाळी आठच्या सुमारास गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापुरातील सागरमळा भागातील राहत्या घराजवळ हल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा नेहमीप्रमाणे शिवाजी विद्यापीठ परिसरातून मॉर्निंग वॉकवरुन परतत असताना, दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पानसरे आणि त्यांच्या पत्नींवर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी एकूण तीन गोळया झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी पानसरे यांच्या मानेला लागली. एक गोळी त्यांच्या हाताला चाटून गेली. उमा पानसरे यांनाही एक गोळी लागली होती. मात्र, त्यांचे प्राण वाचले.

समीरला सात दिवसांचा पीसीआर
इतिहास संशोधक कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी दोन कोटी फोन कॉल्स तपासून सांगलीतून समीर गायकवाड याला बुधवारी सकाळी 4 वाजता अटक केली. न्यायालयाने त्याला सात दिवसांचा पीसीआर ठोठावला असून, समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. 
संजय कुमार, पोलिस महानिरीक्षक
 (कोल्हापूर परिक्षेत्र)

कोण आहे हा समीर गायकवाड ?
32 वर्षांचा समीर विष्णू गायकवाड हा सांगलीच्या शंभर फुटी रोडवरील मोतीचौक परिसरात राहत होता. गायकवाड 1998 पासून सनातन संस्थेत पूर्णवेळ काम करतो. मोबाईल रिपेअरिंगचे काम करणारा समीर गायकवाड हा मुंबईत सनातन संस्थेचा ‘धर्मरथ’ चालवायचे काम करत होता. इतकंच नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब सनातन संस्थेशी संबंधित आहे. 
त्याची पत्नी सध्या गोव्यातल्या आश्रमात राहत आहे. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्या प्रकरणात संशयित म्हणून गायकवाडला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या सांगलीच्या घरी पोलिसांनी छापा मारला आहे. पानसरे यांच्या हत्येत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गायकवाडचा संबंध असू शकतो, असा पोलिसांना संशय आहे. या अटकेमुळे या हत्याप्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेत असा विश्वास पोलिसांना आहे. गायकवाडची झाडाझडती सुरू असून यासंबंधी सांगली, मुंबई, नवी मुंबईत तपास करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

उन्मेष गुजराथी

Thursday, 10 September 2015

गांधींवर 4 थी गोळी कोणी झाडली?

स्वामींच्या मागणीमुळे नेहरु खलनायक ठरणार का?
फोरॅन्सिक व पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये फरक कसा?
उठले नवे वादळ : गांधी वधाची फाईल पुन्हा उघडण्याची सुब्रमण्यम स्वामींची मागणी
--------------------

गांधीजींवर चौथी गोळी झाडणार्‍या व्यक्तीचे नाव अद्यापही गुलदस्त्यात आहे. कदाचित तत्कालीन हिंदुस्थानचे पंतप्रधान पंडित नेहरु यांनी त्यांच्या विरोधकांना संपवण्यासाठीच त्या व्यक्तीचे नाव उघड न करता ते प्रकरण दाबून टाकले होते. यामुळेच गांधी हत्येची फाईल ओपन करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरवरून केली आहे. स्वामी यांच्या या ट्विटमुळे प्रचंड वादंग माजले आहे.

वारंवार गौप्यस्फोट करून व वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात राहणार्‍या स्वामी यांच्या या वक्तव्यामुळे नवे वादळ उठले आहे तर दुसरीकडे नथुरामप्रेमींना आनंदाच्या उकळ्या फुटत आहे. 20 जानेवारी 1948 रोजी गोडसे यांनी गांधीजींची क्रूड बॉम्बने हत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात त्यांना अटकही झाली होती. मात्र माऊंट बॅटन यांनी 22 जानेवारी रोजी गोडसे यांची मुक्तता केली. वास्तविक इतक्या मोठ्या नेत्याची हत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍याला सोडून देणे यात मोठे षडयंत्र होते, असा आरोप स्वामी यांनी दुसरे ट्टिट करताना केला आहे.

स्वामी यांनी गांधी हत्येवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यासाठी ट्विटर हे माध्यम निवडले आहे. आज तीन ट्विट करत त्यांनी आपले प्रश्‍न पुढे रेटले आहेत. रॉयटर्स आणि छध कढ च्या फोटोंमध्ये गांधीजींना चार गोळ्या लागल्याचे दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात खटल्यात त्यांना तीन गोळ्या लागल्याचे दर्शविले आहे. त्यानुसारच खटला चालवला गेला. असे का?, असा सवाल स्वामी यांनी पहिल्या ट्विटमध्ये केले आहे. नथुराम गोडसेने गांधीजींवर फक्त तीन गोळ्या चालवल्या होत्या. त्यामुळे जर चार गोळ्या त्यांना लागल्या होत्या तर ती चौथी गोळी कुणी झाडली होती? कोणत्या गोळीने गांधीजींच्या छातीचा वेध घेतला?, गांधीजींचे शवविच्छेदन करण्यात आले होते का?, असे अनेक प्रश्‍न स्वामी यांनी पुढच्या ट्विटमध्ये उपस्थित केले.

गोडसेने गांधीजींवर इटालीयन बेराटा पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. हे पिस्तुल तेव्हा भारतात केवळ ब्रिटिश सैनिकांकडेच असायचं. त्यामुळे हे पिस्तुल गोडसेकडे कुठून आलं?, त्याला हे पिस्तुल कुणी दिलं?, याची चौकशीच झालेली नाही, ही बाबही स्वामी यांनी आपल्या एका ट्विटमध्ये मांडली आहे. गोडसेला गांधीजींवर गावठी बॉम्बने हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 20 ऑगस्ट 1948 रोजी अटक झाली होती आणि 22 जानेवारी रोजी माउंटबॅटनने त्याची सुटका केली, याचा उल्लेखही स्वामी यांनी आपल्या एका ट्विटमध्ये केला आहे. स्वामी यांनी गांधी हत्येतील विरोधाभासांवर प्रकाश टाकताना हा खटलाच पुन्हा उघडण्याची मागणी रेटल्याने त्यावरून आता नवे वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चौथी गोळी मारणारा इसम हा ब्राह्मणेत्तर असावा असा संशय यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे. नेहरुंनी गोडसेंना पुढे करून तत्कालीन हिंदुमहासभेचे नेते, नेहरुंचे कट्टर विरोधक व प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जाणीवपूर्वक गोवण्यात आले.
मात्र चौथी गोळी मारणार्‍या या इसमाचा उलगडा झाल्यास या प्रकरणातील सत्य उघडकीस येणार आहे व यामुळे नेहरु मात्र खलनायक ठरणार आहेत. याप्रकरणातील आरोपी स्वा. सावरकर यांना अनायासे क्लिनचिट मिळणार असून इतिहासाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळेच गांधी हत्येची फाईल पुन्हा ओपन करावी या स्वामींच्या मागणीला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.

इतकेच काय पण चौथी गोळी झाडणार्‍या व्यक्तिचा इतिहासच काय पण नावदेखील तत्कालीन नेहरुप्रणित काँग्रेस सरकारने उघड केले नाही. ही चौथी व्यक्ती अद्यापही अज्ञातच आहे. या चौथ्या व्यक्तीचे नाव समजल्यास फार मोठ्या इतिहासाच्या गूढ प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो. कदाचित चौथ्या व्यक्तिचे नाव उघडकीस आणल्यास तत्कालीन सरकारला तापदायक ठरले असते व ब्राह्मणांची हेतुपुरस्सर हत्या करण्याचे षडयंत्रही उघडकीस आले असते. 
यामुळेच गांधीजींच्या फोरॅन्सिक व पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्या चौथ्या गोळीचा फरक आढळून येतो. चौथी गोळी मारणार्‍या व्यक्तीचे नाव जाहिर करावे अशी मागणी स्वामी यांनी केली आहे.

गांधी हत्या प्रकरणी सावरकरांना अटक कशी झाली ?
गांधीजींची हत्या नथूराम गोडसे याने ३० जानेवारी, १९४८ या दिवशी नवी दिल्ली येथे केली. या हत्येमध्ये येनकेनप्रकारेण सावरकरांना गोवून वाढत्या हिंदुत्ववादी चळवळीला चिरडून टाकण्याचा चंग नेहरू सरकारने बांधला होता. त्यामुळे नेहरू सरकारने खालीलप्रमाणे कुटिल कारवाया केल्या –

कोणत्याही कायद्याला पुर्वानुलक्ष्यी प्रभावाने लागू करणे हे अनैतिक समजले जाते. परंतु, नेहरू सरकारने मुंबई सार्वजनिक सुरक्षा कायदा दिल्ली प्रदेशाला 2 जानेवारी, 1948 पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केला. यासाठी 2 जानेवारी, 1948 रोजी एक अध्यादेश काढण्यात आला. केवळ गांधी हत्या खटल्यासाठीच हा बदल करण्यात आला. ब्रिटिशांनी जेव्हा जेव्हा दुसर्‍या महायुद्धाच्या काळात विशेष न्यायालये स्थापन केली तेव्हा तेव्हा काँग्रेसी पुढा-यांनी त्याविरूद्ध आरडाओरडा केला परंतु गांधी हत्या खटल्यासाठी मात्र नेहरू सरकारने बिनदिक्कतपणे विशेष न्यायालयाची स्थापना केली. मुंबई सार्वजनिक सुरक्षा कायदा हा अत्यंत जुलमी स्वरूपाचा होता. त्यात ज्यूरीची व्यवस्था नव्हती. अपिलासाठीची मुदतही केवळ 15 दिवस होती. (अन्यथा ती 60 दिवस असते.)

नेहरू - पटेल आणि मंडळींना काहीही करून सावरकरांना या खटल्यात गोवायचे होते. त्यामुळेच पटेलांनी कटाच्या संदर्भात या प्रकरणांचा तपास करण्याचा आदेश पोलीसांना दिला होता. त्यामुळेच पटेलांनी "कटाच्या संदर्भात" या प्रकरणांचा तपास करण्याचा आदेश पोलीसांना दिला होता. सावरकर या खटल्यात गुन्हेगार म्हणून शाबित व्हावेत आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हावी असा आग्रह नेहरूंनी धरल्याचे मुख्य सरकारी वकील मणियार यांनी यासंबंधात कोणतेही प्रतिज्ञापत्र करून ठेवले नाही.

- उन्मेष गुजराथी


Who fired 4 th bullet on Gandhi?

Will Nehru be branded as a villain due to Swamy’s demand ?

How forensic and post-mortem reports defer ?

New controversy erupts: Subramanian Swamy demands reopening of Gandhi assassination case

The name of the person who fired fourth bullet on Mahatma Gandhi is still shrouded in mystery. Probably with a view to fix his opponents, former then Prime Minister late Pandit Nehru might have not disclosed the name of that assailant to hush up the matter. As such the case of Gandhi assassination be reopened, senior BJP leader Subramanian Swamy has demanded through twitter. Swamy’s twitter has created ripples in political circles.

A new storm has erupted due to Swamy’s utterances, who is known for hogging limelight with his controversial statements. On the other hand the followers of Nathuram Godse are rejoicing over this.   

Godse tried to kill Gandhi on 20 January1948 by crude bomb. He was arrested in that matter, but Lord Mountainbatten freed him on January 22. Basically there was a conspiracy to free the accused trying to kill such a great leader, Swamy has said in his second twit. Swamy has selected twitter as a medium to raise questions about the Gandhi assassination. Today with 3 twits he has pushed forward his questions.

The photographs by the Reuters and Chhath Katha show that Gandhi suffered 4 bullets injuries. But in actual trial it was stated that Gandhi suffered 3 bullet injuries and the trial was conducted on the same presumption. Why this disparity ? Swamy has questioned in his first tweet. Nathuram Godse had fired three rounds Gandhi. So if Gandhi suffered 4 bullet injuries, who fired the 4 th round ? Which bullet proved fatal for Gandhi ? Whether a post mortem was carried on Gandhi’s body ? These questions Swamy has raised in his tweets.    

Godse fired on Gandhi using the Italian Beretta, a semi-automatic pistol. These type of pistols were used by British soldiers in those days. But it was never inquired from whom Godse obtained  that pistol ? Swamy has pointed out this matter in his tweets.

It is suspected that the 4 th round was fired by a non-Brahmin person. Using Godse as a front man, Nehru also tried to implicate his arch rival and Hindu Mahasabha leader Swatantryaveer Savarkar in the case. But the truth will come to the fore if the identity of the person firing 4 th round is disclosed. However in such a situation, Nehru will prove to be a villain. In that case there is likelihood of Swatantryaveer Savarkar, one of the accused in the case, getting a clean chit and the history being re-written. That is the reason Swamy’s demand to reopen the Gandhi assassination case, has become important.
  
Neither name nor the background of the person firing the 4 th round was disclosed by the then Congress Government led by Nehru. This person is still unknown. If his identity is disclosed, this mysterious matter would be solved. Probably if the identity of that person was revealed that time, the sinister design of the then Government, to kill Brahmins intentionally would have surfaced. That is the reason there is a difference between forensic and post mortem report related to the Gandhi assassination. As such the name of the person firing 4 th round be disclosed, Swamy has demanded.
     
How Savarkar was arrested for Gandhi assassination ?
Gandhi was killed on 30 January 1948 in new Delhi. Nehru had vowed to implicate Savarkar in this case and crush the Hindutva movement. As such the Nehru Government indulged in  villainous activities.

To make any act effective with retrospective effect is considered improper. But the Nehru Government made the Bombay Public Security Act applicable to Delhi region with retrospective effect from 2 nd January 1948. An ordinance was issued on that day for this. This change was made only for the Gandhi assassination trial. Whenever the Britishers had set up special courts during second world war, the Congress leaders had opposed them. But for the Gandhi trial, the Nehru Government set up a special court. The Bombay Public Security Act was very stringent and there was no provision of jury in it. The duration for appeal was also very short...15 days as against normal 60 days.

Nehru,Patel and others were wanting to implicate Savarkar in this trial. That is the reason Sardar Patel ordered police to investigate this case of alleged conspiracy. Chief Public Prosecutor Daftari had told Advocate M B Maniar representing Godse, that Nehru was insistent that Savarkar was proved guilty and was sent to gallows. Unfortunately neither Daftari nor Maniar prepared any affidavit about this.

...Unmesh Gujarathi


Friday, 4 September 2015

कोट्यवधींच्या भ्रष्टाचारात लालबागचा राजा


बेकायदेशीर अर्थकारणाला लगाम घालण्याची मागणी
संपत्तीचा कुठेही लेखाजोगा नाही
अधिकार्‍यांचाही ट्रस्टींना छुपा पाठिंबा?
दानपेट्यांच्या संख्यांची नोंद धर्मदाय आयुक्तांकडे देण्यात यावी
---------------------------------

लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव व शिवसेनेचे शिवडी विभागाचे संघटक सुधीर साळवी व त्यांच्या कार्यकारणीतील सर्वांनी कोट्यवधी रुपयांची माया जमविली असून, त्यांची पदावरून त्वरीत हकालपट्टी करण्यात यावी व त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेची त्वरीत चौकशी करण्यात यावी, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक महेश वेंगुर्लेकर 18 सप्टेंबरपासून उपोषणास बसणार आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांची त्वरीत चौकशी करावी, व त्याची अमलबजावणी करावी, असे तातडीचे आदेश मुंबई हायकोर्टाने चॅरिटी कमिशनरला दिले आहे.

मुंबईकरांसह अवघ्या महाराष्ट्रवासियांचे दैवत असलेले लालबागचा राजा तेथील मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी मात्र उत्पन्नाचे साधन ठरले आहे. दरवर्षी लाखो भाविक लालबाग राजाच्या दर्शनासाठी येत असतात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी कोट्यवधींची रक्कम, सोने-चांदी व हिर्‍यांचे दागिने बाप्पाच्या चरणी अर्पण करतात. दरवर्षी या मंडळाची कोट्यवधींची उलाढाल असते. मात्र भक्तांकडून श्रद्धेपोटी येणार्‍या या संपत्तीचा मंडळाकडून हिशोब ठेवला जात नाही. लालबागचा राजा मंडळाला गणेशोत्सव कालावधीत कोट्यवधींच्या जाहिराती मिळतात, त्याचा कुठेही हिशोब ठेवला जात नाही. इतकेच नव्हे तर दर्शनासाठी येणार्‍या महिला भाविकांसोबत अश्‍लिल चाळे होत असल्याचेही सिसिटिव्ही फुटेजद्वारे उघड झाले आहे.

लालबाग राजाच्या मंडळात दरवर्षी होत असलेली कोट्यवधी रुपयांची उलाढाल आणि त्यातून होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश मागील वर्षी (31 ऑगस्ट 2014) राज्यपालांनी विधी व न्याय विभागाला दिले होते. मंडळ म्हणून ज्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी केली गेली आहे. त्या शासकीय कार्यालयाला अंधारात ठेवण्यात आले असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाल्याने मंडळावर प्रशासक नेमून सर्व पदाधिकार्‍यांची चौकशी गुन्हे विभागाकडून करावी अशी मागणीही वेंगुर्लेकर यांनी केली आहे. मात्र, यानंतरही धर्मादाय आयुक्तांनी यावर ढीम्म राहणे पसंत केले. या प्रकरणामध्ये कुंपणानेच शेत खावे तसे धर्मादाय आयुक्तच कोट्यवधींची माया ओरपत आहे, असा आरोपही वेंगुर्लेकर यांनी केला आहे.
या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, यासाठी वेंगुर्लेकर 28 ऑगस्ट 2014 रोजी लालबाग राजा मंडळासमोर उपोषणास बसणार होते. तेथे उपोषणास परवानगी नाकारल्यास रिजन ऑफिससमोर उपोषण सुरु करणार होते. मात्र तत्पूर्वी पोलिसांनी त्यांच्यावर कलम 149 नुसार फौजदारी खटला दाखल केला होता.

कोट्यवधी रुपयांचा हिशोबच नाही
संत ज्ञानेश्‍वर पुस्तक पेढीवर 70 लाख 90 हजार रुपये, इतर गणेशोत्सव मंडळांना 18 लाखांची देणगी देण्यात आली आहे. रुग्ण सहाय्य निधीवर 4 करोड 30 लाख रुपये, स्वामी विवेकानंद शिष्यवृत्तीसाठी 1 करोड 4 लाख रुपये, सावरकर ग्रंथपाल कर्मचारी वेतन पुस्तकावर 14 लाख 44 हजार, लालबागचा राजा डायलेसीस सेंटर वर 3 करोड 89 लाख रुपये, भाविकांना अल्पोपहार म्हणून 59 लाख रुपये, सुरक्षा व्यवस्थेसाठी 36 लाखांचा, सुलभ शौचालय बांधकामासाठी 76 लाख 40 हजार, ध्वनीक्षेपकावर 97 लाख 73 हजार रुपये खर्च केल्याचे दाखवण्यात आले आहेत.

मांडवली पोलिसांशीही
दक्षिण मुंबईतील एक अतिरिक्त पोलीस आयुक्त तर लालबागचा राजाच्या दर्शनासाठी रोज 15 ते 20 लोकांना पाठवायचा. मग कसा राहील पोलिसांचा लालबागचा राजाच्या कार्यकर्त्यांवर दरारा? लालबागचा राजाचे 5 हजार स्वयंसेवक असल्याचे सांगण्यात येते. त्यातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी तर दर्शनाच्या नावाखाली आपले दुकानफच मांडलेले होते, असे पोलीसच सांगतात. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी चार रांगा असतात. नवस व मुखदर्शनासाठी असलेल्या दोन रांगांसाठी आम पब्लिक असते. परंतु व्हीआयपी व जवळच्या रहिवाशांसाठी असलेल्या दोन रांगांमध्ये कार्यकर्ते आपली माणसे घुसवतात. त्यामुळेच त्याठिकाणी चेंगराचेंगरी व मारामारी होते. प्रसंगी कार्यकर्ते पोलिसांवरही हात उचलतात. हे कुठेतरी आता थांबले पाहिजे. लालबागचा राजाच्या आयोजकांनी भविष्यात पुन्हा लालबागचा राजाच्या स्टेजवर व आजूबाजूला अनुचित प्रकार घडू नये म्हणून सभ्य, संयमी, प्रामाणिक व नॉर्मल कार्यकर्त्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे.

मंडळ अद्याप बरखास्त का नाही?
मंडळाकडून कोट्यवधी रुपये खर्च करताना, एखाद्या कंपनीला, कंत्राटदाराला काम देताना धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. अशी कोणत्याही प्रकारची परवानगी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून घेण्यात आलेली नाही. लालबागचा राजा मंडळाकडून धर्मदाय आयुक्त कार्यालयाला मंडळाकडे येणार्या व केल्या जाणार्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा हिशोब, केलेल्या खर्चाच्या पावत्या, सादर केल्या जात नाहीत. वयामुळे मंडळाची माहिती धर्मदाय आयुक्तांकडे नसल्याने माहिती अधिकारात अशी माहिती देता येत नाही असे माहिती अधिकारात कळविण्यात आले आहे.

लालबागचा राजा मंडळाकडून केला जाणारा आर्थिक व्यवहार पारदर्शक नसल्याने, लोकांकडून मिळणार्या दान रुपी पैसे, सोने, चांदी यांची कुठलीही नोंद सरकारकडे केली जात नसल्याने मंडळाच्या पदाधिकार्‍यांकडून मोठ्या प्रमाणात अफरातफरी करण्यात येत आहे. याप्रकरणाची गुन्हे विभागाकडून चौकशी केली जावी म्हणून वेंगुर्लेकर यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, धर्मादाय आयुक्त तसेच पालिका आयुक्तांना याबाबत पुराव्यासह सविस्तर निवेदन दिले असून, गुन्हे विभागाकडून मंडळ आणि त्यांचे पदाधिकारी आणि सभासद यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. या भ्रष्टाचारात मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी इतकेच काय पण पोलिस प्रशासन, मुंबई महानगर पालिकेचे वॉर्ड ऑफिसर, लिगल ऑफिसर, धर्मदाय आयुक्तांचे पदाधिकारी सारेच सामील आहेत.
लालबाग राजा मंडळाचे 2005पासून सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास मंडळातील सर्व गैरव्यवहार आणि अफरातफर उघडकीस येतील. व्हीआयपी गेटवर असलेले महेश पावसकर आणि मंगेश दळवी हे कार्यकर्ते बेकार असूनही त्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे. 2011 मध्ये विजया रेसीडन्सीच्या पहिल्या मजल्यावरून कोट्यवधींची संपत्ती असलेली मंडळाची पेटी चोरीला गेली होती. मात्र याबाबत रितसर तक्रार नोंदवण्यात आली नाही. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच मंडळाच्या मानद सचिव साळवी यांची त्वरीत हकालपट्टी करण्यात यावी. यापुढेही आपण हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.- महेश वेंगुर्लेकर, समाजसेवक
मागील वर्षी पोलीस शिपाई महिलेने आपला विनयभंग झाला, आपणास राजाच्या स्टेजवरून अत्यंत वाईटपणे हाकलले गेले अशी तक्रार वरिष्ठांकडे केली. परंतु त्या शिपाई महिलेच्या तक्रारीची वरिष्ठांनी कित्येक दिवस दखल घेतलेली नव्हती. इतक्या लांबून भाविक राजाच्या एका झलकसाठी येतात. तासन्तास उभे राहतात. त्यांच्या श्रद्धेची जराही पर्वा केली जात नाही. चरणावर माथा टेकवण्यासाठी जराही वेळ न देता त्यांना अक्षरशः ढकलण्यात येते. यात लहान बाळांना घेऊन येणार्‍या महिला, वृद्धांचाही समावेश असतो. ढकलल्यामुळे हे भाविक पडण्याची जराही पर्वा हे उद्धट कार्यकर्ते करीत नाहीत. - स्मिता तांबे, अभिनेत्री
पालिकेची परवानगी न घेता मैदाने, भिंती तोडल्या
माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहिती नुसार लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाला 2012 मध्ये मंडप बांधण्यासाठी 953 खड्ड्यांच्या बदल्यात 23 लाख 56 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. मात्र या दंडाची रक्कम अद्यापही मंडळाकडून वसूल करण्यात आलेली नाही. तसेच 2013 मध्ये मंडळाला 5 लाख 60 हजार 638 रुपयांचा दंड बसवण्यात आला आहे. 2012 व 2013 मध्ये 29 लाख 16 हजार 638 इतका दंड आणि नुकसान भरपाईची रक्कम अद्याप या मंडळाने पालिकेकडे अदा केलेली नाही. ज्या गणेशात्सव मंडळांनी मागील दंड भरला नसेल अशा मंडळांना मंडप बांधण्यात परवानगी देता येत नाही. मंडळाने 19 लाखाचा दंड थकवला असला तरी अधिकार्‍यांनी पालिकेचा नियम केराच्या टोपलीत टाकून मंडळाला या वर्षीही मंडप उभारण्यासाठी तसेच खड्डे पाडण्यास परवानगी दिलेली आहे.

पालिका प्रशासन ढीम्म
गणेशोत्सवासाठी भला मोठा मंडप उभारला जातो. यासाठी ठिकठिकाणी खड्डे पाडले जातात. हे खड्डे न बुजवल्यास पालिका अशा मंडळाला दंड आकारते. सन 2012 मध्ये पालिकेच्या ए-दक्षिण विभागाने सार्वजनिक मालमत्ता रस्ते पदपथावर खड्डे मारल्याबद्दल लालबाग मंडळाला 29 लाख 56 हजार रुपयांचा दंड आकारला होता. मात्र या मंडळाकडून या आदेशाला केराची टोपली दाखवली असून,पालिका प्रशासनाचाही मंडळाला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा असल्याचे दिसते.

नव्या बडव्यांना आवरा!
स्वत:ला कार्यकर्ते म्हणवून घेणार्‍या शेकडो नव्या बडव्यांना कोणतीही शिस्त नाही. यामुळेच या मंगलमूर्तीच्या द्वारातच विनयभंगासारखे अमंगल कृत्य होते. यामुळेच इतकेसारे होऊनही मंडळाचे भ्रष्ट पदाधिकारी मूग गिळून गप्प आहेत. नव्हे त्यांना उघड-उघड समर्थन करत मस्तवालपणे फिरत आहेत.
...............................................................................

गणेशभक्तांच्या भावनांशी अर्थपूर्ण खेळ करीत आणि उत्सवाचे बाजारीकरण करीत लालबाग राजा मंडळ कोट्यवधीचे दान पदरी पाडत आहे. बाप्पांच्या नावाने श्रद्धाळूंच्या खिशाला चाट लावणार्‍या या मंडळाच्या अर्थकारणाला लगाम घालण्याची आणि संबंधितांवर कायदेशिररित्या कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

देणगीस्वरुपात मिळणार्‍या संपत्तीचा कुठेही लेखाजोगा नाही की धर्मादाय संस्थेकडे नोंद नाही. दानपेट्यांची संख्येची माहिती नाही. या सर्व गैरव्यवहारांचे बादशाह असलेले मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवींच्या हकालपट्टीची मागणी वेंगुर्लेकर यांनी केली आहे.

केवळ मानद सचिवच नव्हे तर महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, पेलीस, आयकर विभागाचे अधिकारी धर्मदाय आयुक्त, कायदा सुव्यवस्था अधिकारी यांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. मात्र या सर्व अधिकार्‍यांचाच मंडळाला छुपा पाठिंबा असल्याचे दिसून येते. सरकारी अधिकार्‍यांच्या आर्थिक संगनमतामुळे गैरव्यवहार फोफावला आहे. 

पैशासाठी बेकायदेशीर हनुमान मंदिर 
लालबागच्या राजा गणेशोत्वस मंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करुन हनुमान मंदिर बांधले आहे. पालिका अधिकारी आणि मंडळाच्या संगनमताने हे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराला सोन्या-चांदीने मढवलेले आहे. लालबागच्या राजाचे आगमन होते नेमके त्याच ठिकाणी मोक्याची जागा बघून हे मंदिर बांधण्यात आले आहे. काही वर्षापुर्वी हे मंदिर 10 बाय 15 फुटाचे होते. त्यानंतर आपली सोय बघत मंडळाने हे मंदिर 40 बाय 55 फुटाचे केले. हे मंदिर उभरताना मंडळाने पालिकेची किंवा धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेतली नाही. धर्मादाय आयुक्त कार्यालयात असे कोणतेही मंदिर बांधल्याची नोंद नसल्याची बाब माहिती अधिकारामध्ये उघडकीस आली आहे. मंडळाच्या पदाधिकारी आणि सभासदांनी आपल्या मर्जीनेच असे बांधकाम केले आहे. या भ्रष्टाचारात मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी इतकेच काय पण पोलिस प्रशासन, मुंबई महानगर पालिकेचे वॉर्ड ऑफिसर, लिगल ऑफिसर, धर्मदाय आयुक्तांचे पदाधिकारी सारेच सामील आहेत. यामुळेच हे सर्व शक्य होत आहे.

वेंगुर्लेकर यांनी पोलीसांना दिलेल्या जबाबात केलेले आरोप 
लालबागचा राजा मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमण्यात यावा. 
सुधीर साळवी गेली 16 वर्षे मानद सचिव या पदावर कार्यरत आहे. त्यांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी.
सर्व खर्च करण्यांचे (1 ते 50 कोटी खर्च) अधिकार अधिकार साळवी यांना कोणत्या प्रशासनाने दिला. लालबागचा राजा मंडळामध्ये ज्यांनी पद भुषविले आहे. या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या दागदागिन्यांची चौकशी करण्यात यावी तसेच संपत्तीची चौकशी करण्यात यावी. 

लालबाग राजा गणेशोत्सवादरम्यान स्थानिक रहिवाशांना ओळखपत्र दिले जाते. यापुर्वी पाकीटमार, साखळी चोर, मोबाईल चोर पोलीसांनी पकडले यावर काळाचौकी पोलीसांनी कोणताही गुन्हा नोंद केला नाही. मंडळाच्या ओळखपत्राचा दुरपयोग अतिरेकी देखील करु शकतात. याबाबत मंडळाचे सचिव यांना योग्य त्या सूचना देऊन त्यांच्याकडून बॉण्ड लिहून घ्यावा.
मंडळाची सन 2011 मध्ये विसर्जन संपल्यानंतर दानपेटी चोरीला गेली होती. त्याबाबत अद्याप काहीही माहिती मिळाली नाही. तसेच स्थानिक पोलीस ठाणेने त्याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. दानपेटी चोरीला गेल्यासंदर्भात मंडळाचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासावेत. तसेच या खालील सशंयित लोकांची चौकशी करावी.1) सूर्यकांत पवार (बी विंग, लालबाग राजा सोसायटी)2) संजय धुमक (जी विंग लालबाग राजा सोसायटी) (या इसमाकडे दानपेटी ठेवलेल्या रुमची चावी होती.), 3) सुगत पेडेंलकर (एफ विंग लालबाग राजा सोसायटी), 4) राजेंद्र हळदणकर (58 टेनामेंट पेरु कंपाऊड) याबाबत रोहीदास जाधव हे साक्षीदार आहेत.
  • लालबागचा राजा मंडळाकडून घेण्यात येणार्‍या करोडो रुपयांच्या जाहिराती शपथ पत्रावर घेतली जात नाही याची चौकशी करावी.
  • मंडळाकडून दिला जाणारा रुग्ण सहाय्यनिधी याचे लेखी रेकॉर्ड ठेवलेले नाही. या निधीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत चौकशी करावी. तसेच स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्याबाबत देखील मंडळाकडे चौकशी करावी.मंडळाकडून करण्यात येणारी आरेरावी व दादागिरी यास आळा घालावा. याबाबत मंडळाकडून शपथपत्र घ्यावे. लालबागच्या राजास जे भाविक सोन्या चांदीचे अलंकार दान करतात त्याचे वजन व संख्या याची माहिती जाहीर करावी.
  • मंडळाकडून किती खासगी सुरक्षा रक्षक नेमले जातात व त्यावर किती खर्च केला जातो, याची माहिती घेण्यात यावी. तसेच खासगी सुरक्षारक्षकांचे नाव, पत्ते, संपर्क क्रमांक अशी माहिती स्थानिक पोलीसाकडे मंडळाने दिली पाहिजे.
  • मंडळाकडून देण्यात येणार्‍या ओळखपत्रांची यादी गांभीर्याने पोलीस ठाणेकडे असावी.
लोकसत्ता गेट, मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी भाविकांची गर्दी होते. तेथे मंडळाचे कार्यकर्ते पैसे घेऊन भाविकांना दर्शनासाठी वाम मार्गाने सोडतात. असा प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी योग्य ते अधिकारी व अमंलदार नेमून गैरप्रकारे दर्शन होणार नाही. याची दक्षता घ्यावी. या गेटच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन मंडळाचे आयकार्ड लावून अतिरेकी प्रवेश मिळवून घातपात करु शकतो, असा प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी.वेंगुर्लेकर यांनी पोलीसांना दिलेल्या जबाबात केलेले आरोप लालबागचा राजा मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमण्यात यावा. सुधीर साळवी गेली 16 वर्षे मानद सचिव या पदावर कार्यरत आहे. त्यांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी.सर्व खर्च करण्यांचे (1 ते 50 कोटी खर्च) अधिकार अधिकार साळवी यांना कोणत्या प्रशासनाने दिला.

मंडळाकडून दिला जाणारा रुग्ण सहाय्यनिधी याचे लेखी रेकॉर्ड ठेवलेले नाही. या निधीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत चौकशी करावी. तसेच स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्याबाबत देखील मंडळाकडे चौकशी करावी.

मंडळाकडून करण्यात येणारी आरेरावी व दादागिरी यास आळा घालावा. याबाबत मंडळाकडून शपथपत्र घ्यावे. लालबागच्या राजास जे भाविक सोन्या चांदीचे अलंकार दान करतात त्याचे वजन व संख्या याची माहिती जाहीर करावी. मंडळाकडून किती खासगी सुरक्षा रक्षक नेमले जातात व त्यावर किती खर्च केला जातो, याची माहिती घेण्यात यावी. तसेच खासगी सुरक्षारक्षकांचे नाव, पत्ते, संपर्क क्रमांक अशी माहिती स्थानिक पोलीसाकडे मंडळाने दिली पाहिजे.

मंडळाकडून देण्यात येणार्‍या ओळखपत्रांची यादी गांभीर्याने पोलीस ठाणेकडे असावी.
लोकसत्ता गेट, मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी भाविकांची गर्दी होते. तेथे मंडळाचे कार्यकर्ते पैसे घेऊन भाविकांना दर्शनासाठी वाम मार्गाने सोडतात. असा प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी योग्य ते अधिकारी व अमंलदार नेमून गैरप्रकारे दर्शन होणार नाही. याची दक्षता घ्यावी. या गेटच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन मंडळाचे आयकार्ड लावून अतिरेकी प्रवेश मिळवून घातपात करु शकतो, असा प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी.
  • भ्रष्ट सुधीर साळवी यांची हकालपट्टी करण्यात यावी
  • सर्व दानपेट्यांतील सोने-चांदी, रोकड धर्मदाय आयुक्तांनी ताब्यात घेऊन त्याची मोजणी करावी
  • उपक्रम राबविण्यासाठी घेतलेल्या शाळेचे करारपत्र नाही.
  • शाळेच्या शेडसाठी 24 लाखांचा खर्च, शेडच्या खर्चाचा कुठेही तपशील नाही.
  • सीसीटीव्ही फुटेज पोलीस ठाण्यात जमा करण्यात यावे.

उन्मेष गुजराथी

English Translation of the News

 “Lalbaugcha Raja” caught in multi-crore rupees corruption” 

 Demand to control financial irregularities

No accountability of massive property

Civic officers are connivance with trustees

Details of donation boxes should be provided to charity commissioner 


Senior social worker Mahesh Vengurlekar has decided to begin fast hunger strike from 18 th September  to demand removal of Sudhir Dalvi and other members of executive committee of the “Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal” on charges that he and other committee members have  amassed crores of rupees illegally. Dalvi is also a Shivadi Vibhag Sanghtak of the Shiv Sena.

Lalbaugcha Raja is the most famous Sarvajanik Ganapati, installed at Lalbaug, a prominent locality in Mumbai during Ganesh festival.

 In view of the Vengurlekar’s allegation, the Bombay High Court has directed the Charity Commissioner to immediately inquire into the activities of the Mandal and take necessary action. Lakhs of devotees throng Lalbaug for a darshan of Lord Ganesha every year during Ganesh festival. On fulfilment of wishes, devotees offer gold, silver and diamond ornaments and different type gifts to Lord Ganesh. The annual turn over of the “Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal” runs in crores. But no accounts of the offerings made by devotees are maintained by the Mandal. Even the accounts of the advertisements worth crores of rupees are not maintained. Besides, the workers of the Mandal allegedly misbehave with women devotees. The CCTV footage substantiates this charge.

On 31 st August 2014 (last year) the Maharashtra Governor had directed the State Law and Judiciary department to inquire into the alleged mismanagement of crores of rupees annual turn over of the Mandal. Based on these directions, subsequently the Mandal was registered with charity commissioner.

An RTI query revealed that the office bearers of the Mandal keep the Government offices in the dark about its activities. As such Vengurlekar had demanded a CBI inquiry of the activities of the office bearers of the Mandal. But the charity commissioner reportedly preferred to maintain silence. In fact even the charity commissioner amassed crores of rupees by shielding the office bearers, Vengurlekar alleged adding that it is like “a fence destroying the farm”.

Vengurlekar was to begin his hunger fast in front of the Mandal from 28 August 2014 to demand the inquiry into alleged corruption. Since he was denied permission to sit in front of the Mandal, he was to begin the fast in front of the Region Office. But before he could begin the fast, the police booked him under section 149 IPC.

No accounting of crores of rupees
The Mandal has been donating money to different organisations, but there no proper records are maintained. The recent transactions are:  Rs 70.90 lakh to the “Sant Dnyaneshwar Book Bank”, Rs 18 lakh to other Ganeshotsav Mandals in the city, Rs 4.30 crore were shown to have been spent for assistance to needy patients, Rs1.04 crore spent towards “Swami Vivekanand Scholarship”, Rs 14.44 lakh for salaries of the employees of the “Savarkar Library” and for purchasing books, Rs.3.89 crore were spent towards the “Lalbaugcha Raja Dialysis Centre”, Rs 59 lakh were spent for providing provided to devotees, Rs 36 lakh were spent towards security arrangements, Rs.76,40 lakh spent for constructing the Sulabh Shauchyalaya and Rs. 97.73 lakh were spent for loudspeaker service. 


Collusion with police
An additional CP from South Mumbai sends 15 to 20 people for the darshan of Ganesh every day. Then how would police have any control on the Mandal ? It is said that the Mandal has a  strong force of over 5000 workers. According to police sources, most of them have set up own shops to facilitate easy darshan of Ganesha. There are four queues for darshan. Two queues for “Mukh Darshan” and “Navas”(wish fulfilment) are for general public. Other two queues are for VIPs and the people residing in neighbourhood. The volunteers of the Mandal indiscriminately intrude to force the entry of favoured people due to which there is always near stampede like situation resulting into free for all and fisticuffs are exchanged. In the melee, sometimes even the police are beaten up. This has to be should stopped. To avoid such  ugly scenes, the Mandal should deploy honest, tolerant and decent workers on the podium and surrounding area.  

Why the Mandal has not been abolished ?
“A charitable organisation is required to seek permission of the Charity Commissioner, before spending crores of rupees and awarding contracts to any company/contractor. But the Mandal does not seem to obtain such permission. No receipts for the money spent, donations received are submitted to the Charity Commissioner. Since no information is provided to the  Charity Commissioner, the CC’s office pleads helplessness in providing required  under RTI.  

There is no transparency in monetary dealings,  no records are maintained about the donations worth crores of rupees, including gold and silver ornaments and a possibility of massive embezzlement is not ruled out. Mahesh Vengurlekar in a memorandum (with proof) to the Governor, Chief Minister, DGP, Police Commissioner, Charity Commissioner and Municipal Commissioner, has demanded that a CID inquiry be instituted against the office bearers  and members of the Mandal. In this massive corruption even the police administration, BMC’s ward officer, legal officer and officers of the Charity Commissioner’s office are involved, Vegurlekar has alleged.
   
If the CCTV footage of the Mandal since 2005 is checked, then all the fraudulent activities of the office bearers will be exposed. Mahesh Pawaskar and Mangesh Dalvi, deployed near the VIP gate are unemployed. But both have amassed massive wealth. In 2011 a box containing donations worth crores of rupees, kept on the first floor of “Vijay Residency” was reported to have been stolen. However no complaint was lodged. All these matters should be inquired into and honorary secretary Salvi should be thrown out. I will continue to expose the corruption in the Mandal”..
 Mahesh Vengurlekar, Secretary

“ Last year a woman police constable had complained to her seniors that the Mandal volunteers misbehaved with her and she was thrown down from the Ganesh podium. But no cognizance was taken.The devotees come from far off places to have a glimpse of the Lord Ganesh. But they are pushed even before they bow down to pay obeisance. The devotees include aged and women with infants in arms. The workers of the Mandal do not bother even if the devotees fall”....Smita Tambe, Actress   
  
Non payment of fine
As per the information obtained through RTI query, a fine of Rs 23.56 lakh was imposed on the Mandal for digging 953 pits on the road by the BMC in 2012. But this fine was not recovered. Similarly a fine of Rs 5,60,638 was imposed in 2013. Thus cumulatively a total fine of Rs 29,16,638 was imposed, but the Mandal did not pay the fine. Usually the BMC does not allow Ganeshotsav Mandals to erect pandal if the fine imposed in previous year is pending. But despite failure of the Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal to pay the fine, the BMC officers gave permission to erect pandal this year too.


Control these volunteers   
The volunteers of the Mandal have no discipline. That is the reason the incidents of molestation takes place right in the pandal. Despite this the office bearers of the Mandal not only keep their mouth shut, but encourage these workers.

“ The office bearers of the Mandal are playing with emotions of the devotees and have commercialised the festival to earn crores of rupees. A demand to do curb the activities of the office bearers taxing the devotees, is growing. As such Honorary secretary Sudhir Dalvi, presiding over this “corruption” should be thrown out”, Mahesh Vengurlekar has demanded adding that not only Dalvi, but even BMC’s ward officer, police, IT officers, Charity Commissioner are in connivance with the office bearers. Precisely because of this, financial irregularities have grown manifold”.


Illegal Hanuman Tample
The Mandal has illegally constructed a Hanuman temple by spending crores of rupees in collusion with civic officers, near the place where Ganesh idol is installed during Ganeshotsav. It has been studded with gold and silver. A few years back the temple was spread over 10 feet x 15 feet area. Subsequently the temple area was extended to 40 feet x 55 feet. No permission of either BMC or Charity commissioner was obtained before setting up this temple. An RTI inquiry has revealed that the temple is not on records of the Charity Commissioner and the office bearers and members of the Mandal have constructed the temple illegally. All this is possible because in this “corrupt” deal, not only the president and office bearers of the Mandal, but even police officers, BMC’s ward officer, legal officer and officers of the Charity Commissioner are involved.   


Allegations made by Vengurlekar in his deposition before police
a) Sudhir Dalvi, has been a honorary secretary of the Mandal for the last 16 years. His alleged corrupt deals should be inquired and an administrator be appointed by dissolving the Mandal.

b) An inquiry should be conducted as to who gave the powers to spend funds ( Rs 1 crore to Rs 50 crore) to Dalvi. Also, a stock of the wealth amassed by past and present office bearers of the Mandal should be taken and the source of income verified.

c) The local residents are given identity cards during Ganeshotsav. There have been incidents of the pick-pockets, chain-snatchers, mobile thieves being apprehended during Ganeshotsav. But no offence is being registered by the Kala Chowky police. The identity cards issued by the Mandal can be misused even by the terrorists. As such instructions be issued to the office bearers of the Mandal and an indemnity bond be obtained from the secretary of the Mandal.  

d) A donation box was stolen in 2011. But the local police did not take any action.  As such the CCTV footage be verified and the following suspects be interrogated: 1.Suryakant Pawar (B Wing, Lalbaug Raja Housing Society) 2) Sanjay Dhumak (G Wing, Lalbaug Raja Housing Society) (this man had keys of the room where the donation boxes were stored) 3. Sugat Pendelkar (F Wing, Lalbaug Raja Housing Society) and 4. Rajendra Haldankar (58 Tenement, Peru Compound) (Rohidas Jadhav is a witness in this matter).

e) The advertisements worth crores of rupees are not obtained by furnishing an affidavit. This aspect should be inquired into.

d) No account of medical assistance is maintained. There has been corruption worth crores of rupees in medical fund. Similarly there has been embezzlement worth crores of rupees in “Swami Vivekanand  Scholarship Scheme”. This matter should be inquired and an arrogance of the office bearers be curbed. An affidavit be obtained from the office bearers for this.

e) The number of donated gold and silver ornaments and their weight be made public.

f) The information about number of private security guards deployed and the amount spent on their salaries be made available.Besides, name, address, contact number of security guards be given to local police.

g) A list of the identity cards issued by the Mandal be furnished to the police.


h) The devotees crowd the “Loksatta Gate” and the main entrance where the workers illegally collect money to allow devotees to enter the Pandal. The police officers be deployed to avoid this malpractice. Due precaution should be taken because a terrorists can enter through this gate, using fake identity cards.  

i) The gold-silver accumulated in donation boxes be taken over by the Charity Commissioner for valuation.

j) The Mandal has spent Rs 24 lakh for a shed for the school. However it has not entered into agreement with the school for this.

...Unmesh Gujarathi